लोकसभेत शून्य प्रहराच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणाऱ्या व्होटर लिस्टवर चर्चेची मागणी केली. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणूकीच्या व्होटर लिस्टबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्होटर लिस्टच्या विश्वासर्हातेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे व्होटर लिस्टवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. …
Read More »मतदार यादीत घोळ केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्या आमदाराकीला आव्हान उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांना बजावली नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मतदार यादीत घोळ केल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे योग्यरित्या पालन न केल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. याचिकेची दखल घेऊन सोमवारी उच्च न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या …
Read More »निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतदार यादीच्या घोळासह, आगामी आणि पूर्वीच्या निवडणूकांचा अभ्यास करणार
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, पराभव दिसू लागल्याने मविआचे नेते मतदार यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची टीका
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. …
Read More »विधानसभेच्या मतदार यादीत नाव नोंदणीची १९ ऑक्टोबरपर्यंत संधी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती
भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव …
Read More »मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा कार्यक्रम
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार …
Read More »मतदार म्हणून नाव नोंदवलं नाही, पण मतदान करण्याची इच्छा आहेः बातमी वाचाच
निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात २० …
Read More »राज्यातील नवतरूण मतदारांमध्ये १२.८४ टक्क्यांची तर सर्वाधिक वाढ ३०-३९ वयोगटात केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची माहिती
आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुबार नावे डिलीट करण्याची मोहिम सुरु केली. त्याशिवाय सध्या लोकसभा मतदार संघापूरती मर्यादीत असलेली ही मोहिम आता विधानसभा मतदारसंघातही सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार …
Read More »महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा? मतदार नोंदणी करा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तारखांचा खेळ थांबवला असून, स्थानिक …
Read More »राज्यातील मतदार याद्यांमधून ४० लाख नावे गायब मा.न्या.कोळसे-पाटील यांचा आऱोप
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा केंद्रातील भाजपला फायदा व्हावा यासाठी राज्यातील मतदार यांद्यामधील ४० लाख नावे गायब करण्यात आल्याचा आरोप जनता दलाचे औरंगाबादचे उमेदवार तथा माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रे लँब टेक्नोशियन आणि “No voter left behind” अभियान चालविणारे सयद खालीद सैफुल्लाह यांनी …
Read More »
Marathi e-Batmya