अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेस सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. राज्य उत्पादन शुल्क भवन येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत …
Read More »‘स्वयंम’च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रमांसह पोर्टलची निर्मिती करावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आज मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर …
Read More »काँग्रेसची दुसरी ४३ जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मुलांची नावे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. वैभव गेहलोत …
Read More »अखेर एसबीआयने इलेक्टोरल बॉण्डचा डेटा जमा केला
सोमवारी जारी केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशाचे पालन करून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मंगळवारी इलेक्टोरल बाँड्सचा डेटा भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केला, असे आयोगाच्या पॅनेलने सांगितले. SBI द्वारे शेअर केलेल्या निवडणूक रोख्यांच्या विक्री आणि खरेदीचे तपशील कच्च्या स्वरूपात आहेत जे उघड करतात की कोण किती किमतीचे आणि कोणत्या …
Read More »हरियाणामध्ये फटका नको म्हणून मनोहरलाल खट्टर यांना हटविलेः नायब सिंगे सैनी नवे मुख्यमंत्री
मागील काही महिन्यापासून केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब, हरियाणा चंदीगढ राज्यातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीच्या प्रमुख मागणीवरून आंदोलन छेडले. केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी हरियाणा मार्गे शंभू बॉर्डरवर पोहोचलेल्या सरकारवर पुन्हा एकदा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आदेशान्वये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर
महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, संजय राऊत खोटं बोलतायत
काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये १० जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सध्या प्रकाश आंबेडकर हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून …
Read More »राज्याचा कारभार म्हणजे आंधळ-दळतय अन्… कॅगच्या ठपक्यानंतर गृहनिर्माण विभागाला जाग
मागील काही वर्षात राज्य सरकारकडून नव्या नोकरभरतीवर बंदी कायम असल्याने आणि सरकार व प्रशासनातील अधिकाऱ्यांची अर्थात सेवेकऱ्यांची साठ-गाठ बांधली गेली. त्यामुळेच विविध नव्याने महामंडळे, राज्यस्तरीय समित्या, प्राधिकारणांची स्थापना करण्याचा सपाटाच राज्य सरकारने सुरु केला. त्यातीलच एक प्रकार म्हणजे राज्यातील घऱ खरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी आणि बिल्डर लॉबीला चाप लावण्यासाठी रेरा अर्थात …
Read More »राहुल गांधी यांची घोषणा, जमिनीला चारपट भाव देणार…
देशातील जंगल जमिन आणि पाण्यावर पहिला हक्क हा आदिवासींचा आहे. त्यामुळे आदीवासी समुदायाचा हक्क पहिला या देशावर आहे. मात्र आदिवासींना त्यांचे हक्क डावलून देशातील जंगल, जमिन आणि पाणी मोदी त्यांच्या मित्राच्या घशात घालत आहेत. परंतु काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील आदिवासींचा हक्क त्यांना परत मिळून देणार असून विकास कामांसाठी त्यांची जमिन …
Read More »पंतप्रधान मोदी यांची घोषणा, रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार
नवनवीन योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिकचे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत …
Read More »
Marathi e-Batmya