Editor

पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती

मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश सर्व शासकिय कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना लवकर सोडले

मुंबईसह राज्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, कृषीकर्ज व बियाणांसंदर्भात राज्य सरकारकडून चुकीची माहिती कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून …

Read More »

भास्कर जाधव यांनी निषेध करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोड केक खाऊ घाला प्रश्न आणि लक्षवेधीवर बोलण्यास वेळ न दिल्याने भास्कर जाधव यांनी केला अध्यक्षांचा निषेध

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये किरीट सोमय्या प्रकरण व नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेचा मुद्दा गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात …

Read More »

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा: वेळेत पोहोचा… परिक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन

सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस …

Read More »

बियाणे-खते-खरीप पीक कर्जप्रश्नावरून काँग्रेसने मंत्री मुंडे यांना घेरत केला सभात्याग अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत दिले उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास पुकारण्यात आला. यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात येत असल्याची प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस सदस्यांच्या प्रश्नासमोर मंत्री धनंजय मुंडे यांना …

Read More »

अबू आझमी यांची घोषणा, मी वंदे मातरम् म्हणणार नाही; विधानसभेत गदारोळ १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब

विधिमंडळात मागील दोन दिवसात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणलेला अपात्रतेचा मुद्दा आणि किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्यावरून सभागृहात राजकिय खडाजंगी रंगली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मी वंदे मातरम् म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने सत्ताधारी बाकावरील भाजपा शिंदे गटाच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष दहशतवाद विरोधी पथक 'समन्वय एजन्सी' म्हणून काम पाहणार

राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संबंधितांना शिक्षा होण्यासंदर्भात ते पदार्थ बाळगण्याची मर्यादा कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करणार असल्याची …

Read More »

मोदी-भाजपा विरोधात २६ राजकिय पक्षांचा “इंडिया” लढणार पुढील बैठक होणार मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वाढत्या एककल्ली कारभाराच्या विरोधात देशातील जवळपास २६ सर्वपक्षिय विरोधकांची बैठक आज कर्नाटकातील बंगरूळू येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठी घोषणा करताना विरोधी पक्षांची आघाडी आता यापुढे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स अर्थात इंडिया नावानं लढणार असल्याचे जाहिर केले. तसेच …

Read More »

मंत्री दिपक केसरकर यांची माहिती, ‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहित

‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील पात्र तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अनुदान पात्र अघोषित शाळांना २० टक्के व यापूर्वी २० अथवा ४० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून ६१ हजार शिक्षकांना …

Read More »