Editor

मंत्री विखे-पाटील यांचे निर्देश, अवैध वाळू उपसा प्रतिबंधीत तर नवीन धोरणाची अंमलबजावणी करा महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी., असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा देशातील २२ राज्यांच्या राजधान्यांमध्ये साजरा करणार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

नवी मुंबई मेट्रोच्या कामास विलंब, खर्चात वाढ पण सिडकोकडून हाताची घडी तोंडावर बोट कंत्राटदारावर सिडको मेहरबानः खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज १२ वर्ष उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाली नाही. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. …

Read More »

अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ७० टक्के लोकांचे समर्थन, स्थानिकांच्या समंतीशिवाय… आंदोलनात बाहेरचे लोक होते, आता शांतता

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळली असल्याचा दावा विरोधकांडून करण्यात येतोय. मात्र, हे सर्व दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फेटाळून लावले. आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत तेथील परिस्थितीचा …

Read More »

राजू शेट्टी यांचा इशारा, किती पोलीस, लाठ्या आणि किती गोळ्या आहेत… राज्यातला शेतकरी तेथे जाऊन वाचवतील

बारसू रिफायनरीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातील शेतकरी तेथे जावून शेतकऱ्यांना वाचवतील. यांच्याकडे किती पोलीस आहेत, किती लाठ्या आहेत आणि किती गोळ्या आहेत ते बघू. सरकारने आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवावी, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी शासनावर टीका केली. बारसू …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी तो व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या, महाराष्ट्र बंद नव्हे तर उघड्या डोळ्यांनी बघतोय…. नशिब आंदोलनकांवर अद्याप अर्बन नक्षलवादाचा ठपका....

बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा विरोध वाढत जात आहे. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेथील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, कोकणातील …

Read More »

अजित पवार म्हणाले, चार-पाच लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे बाजूने तर…. वेळ पडल्यास मीही आंदोलकांच्या भेटीला जाईन

बारसू येथील रिफायनरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी गरज पडल्यास जाईन असे सांगत आपली भूमिका …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस मॉरिशसला… दिल्लीतील मोगलांच्या आदेशानुसार बारसूत घडत आहे

नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू असून, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ४ दिवसांपासून स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. अशातच आज २८ एप्रिल रोजी आंदोलकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, बारसू भागात शिंदे-फडणवीसांचा ‘रावणराज’ महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसमध्ये..

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती …

Read More »