कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ …
Read More »संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला …
Read More »पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस पुन्हा म्हणाले, दुसरी वेळ आल्यानंतर उर्वरित सांगेन माझ्या सगळ्या पत्रकार परिषदा पहा मी बोललो त्यात कडी जोडता येईल
जवळपास तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत तो शपथविधी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी …
Read More »सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारला टोला, सोय केली म्हणून ज्योतिर्लिंग दिला नाहीत ना? आसामच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची टीका
काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम असल्याचा दावा केला. त्यामुळे जोरदार वाद उफाळला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आसाम सरकारची ती जाहिरातच ट्विट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवित …
Read More »नाना पटोले, थोरात, चव्हाण एकत्र येत म्हणाले,… आमच्यात कुठलाही वाद नाही काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा
भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहोचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेचे उमेदवार …
Read More »संजय राऊत यांचा पलटवार, वाघाच्या जबड्यात….मग फडणवीस का घाबरत होते? महाविकास आघाडी सरकार असताना अटकेचे षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप
काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या दाव्यावरून त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना …
Read More »दिल्लीतील खलबतानंतर “नाराज” बाळासाहेब थोरात म्हणाले, हे कोणी सांगितले ? मला माध्यमांकडूनच समजत होते
विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत राज्यातील पक्षनेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत दिल्लीतील श्रेष्ठींना पत्र पाठवून कल्पना दिल्याचे सांगितले. मात्र हा राजीनामा काँग्रेसने नामंजूर केला. त्यानंतर …
Read More »सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट विरूध्द शिंदे प्रकरणी नबाम रेबियाचा निर्णय नेमका कसा लागू होतो ? गुरूवारी सकाळपासून पुन्हा सुनावणी
काल मंगळवारी ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत नबाम रेबिया प्रकरणाचे मापदंड लागू होऊ शकत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. तसेच नबाम रेबिया प्रकरण या महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींशी लागू होते अशी विचारणा करत त्याचे स्पष्टीकरण देण्यास शिंदे गटाच्या वकीलांना सूचना केली. त्यानुसार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल कोश्यारींच्या अभिनंदनासह घेतले हे ६ निर्णय पीएम श्री योजनेत ८४६ शाळांचा समावेश
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच पुणे जिल्ह्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर झाल्याने या निवडणूकीच्या प्रचारात सगळेच नेते व्यस्त झाले आहेत. त्यातच राज्यपालांच्या इच्छेनुसार त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मु यांनी स्विकारत नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला ? ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपाची खेळी
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असा खोचक सवाल करत काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे …
Read More »
Marathi e-Batmya