Editor

काँग्रेसची मागणी, पत्रकार वारिशेंच्या हत्येचा तपास न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करा पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या संशयास्पद आहे. या हत्येमागे कोणा कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड होणे गरजेचे आहे. वारिशे हत्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आलेली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आले पाहिजे. यासाठी शशिकांत वारिशे हत्याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश …

Read More »

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरील टीकेला फडणवीसांचे उत्तर,… ते काही ना काही घेऊन येतात काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर

महिनाभरात दुसऱ्यांदा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या दोन गाड्यांना हिरवा कंदील दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले. या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी आले म्हणजे निवडणूका जवळ आल्याची खोचक टीका केली. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर सर्व राजकिय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर …

Read More »

पत्रकार वारिशे हत्याप्रकरण: संजय राऊतांनी केला शिंदे गटाच्या त्या मंत्र्यासोबतचा आरोपीचा फोटो राजकिय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना उधाण

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. तसेच विरोधकांकडून या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात असतानाच शिवेसना(ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या प्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपासाठी सावेंकडून मंत्रिपदाच्या घटनात्मक शपथेचा भंग सहकार मंत्री अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची …

Read More »

वाचा, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे काय खास, कोणत्या सुविधा आहेत यात? फडणवीस म्हणाले, रेल्वे आधुनिकीकरण- विस्तारीकरणासाठी पंतप्रधानांचे योगदान महत्वपूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पातील भरीव निधीमुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, …

Read More »

मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मच्छीमार बांधवांना सक्षम करणार राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ

सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा आले म्हणजे निवडणूका जवळ आल्या अदानी’ संदर्भात राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी कधी बोलणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील …

Read More »

गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी बंदीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली हिंदू सेनेची याचिका दाखल करून घेण्यास नकार

२००२ साली गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना गोध्रा दंगल झाली. त्या दंगलीवरून मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अखेर नरेंद्र मोदी आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांना निर्दोष ठरविले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी नुकतीच बीबीसीने जगभरात …

Read More »