मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी ५ लाख रूपयांची लाच देवू केल्याचा आरोप एका सायबर एक्सपर्टने केल्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे आणखी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक …
Read More »महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठ तयार करणार अभ्यासक्रम केंब्रिज आणि महापालिकेदरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहमती- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई …
Read More »शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी
मुंबईः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित …
Read More »सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच पवारांचा या गोष्टीला विरोध माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका व नागरी बँकांवर नियंत्रणे आणल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिली असतानाही, सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीने नियंत्रणास विरोध करण्याचा शरद पवार यांचा कांगावा आता फोल ठरणार आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी कृषीमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी पवार यांच्या …
Read More »या पाच जिल्ह्यात ७० टक्के रूग्ण तर यानंतर राज्यात निर्बंध लागू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल …
Read More »माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक मंत्रालयात कामगार …
Read More »आता बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्ससह याचे मिळणार मोफत प्रशिक्षण राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा असा साजरा करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असून या दिवशी भाजपाच्या प्रत्येक बुथ मधील केंद्र सरकारच्या योजनेच्या २१ लाभार्थांचा सत्कार करून साजरा करण्यात येणार असून मोदींचा वाढदिवस ते दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या कालावधीत बुथ ते राज्यस्तरावरील एक लाख कार्यकर्त्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याकडे आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूला मंदिर उघडू मंदिरप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे भाजपा, मनसेला खोचक उत्तर
ठाणे : प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून भाजपाकडून राज्यातील प्रार्थनास्थळे, मंदिरे खुली करण्याबाबत महाविकास आघाडीच्या विरोधात कधी घंटानाद, तर कधी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. तसेच मनसेनेही मंदिरे उघडण्याप्रश्नी घंटानाद आंदोलन केले. याप्रश्नी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वक्तव्य करत प्रार्थनास्थळे उघडणार असल्याचे स्पष्ट संकेत देत धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत, हरकत …
Read More »अखेर सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहिर ! या अभ्यासक्रमांसाठी होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी परिक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने या परिक्षा घेण्यासंबधीचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व …
Read More »
Marathi e-Batmya