Editor

कोरोना: मुंबईत हजारापार तर राज्याची ९ हजाराजवळ, मृतकही वाढले ८ हजार ८०७ नवे बाधित, २ हजार ७७२ बरे झाले तर ८० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर मुंबईत हजारापार बाधितांची संख्या नोंदविण्यात आली असून आज १ हजार १६७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर ४ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यात मात्र आज बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ नोंदविण्यात आली असून राज्यात ८ हजार ८०७ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८० …

Read More »

पटोलेंचे आदेश, या महानगरपालिकेच्या निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा आढावा बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे आवाहन करत कल्याण डोंबिवली, वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून …

Read More »

मंत्री राठोड आले, आता कारभारही संभाळतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी १५ दिवसानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी बैठकीत कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. राठोड आता विभागाच्या दैंनदिन कामकाजाला सुरुवात करतील असे नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्री राठोड यांच्यावरू सध्या विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारवेर धरले …

Read More »

“निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकारची अकार्यक्षमता” आ. अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जीएसटीचे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२०-२१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे शिफ्टनुसार नियोजन करण्याचे मुख्य सचिवांनी दिले आदेश कोविड-१९ चे नियम पाळण्यासाठी आवश्यक ते निर्णय घ्या

मुंबईः प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयीन कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येत असल्याने कोविड-१९ नियमावली पाळली जात नसल्याचे दिसून आल्याने मंत्रालयातील वाढता कोरोना प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने योग्य ते आवश्यक निर्णय घ्यावेत असे आदेश राज्याचे …

Read More »

पोहरादेवी गर्दीप्रकरणी मंत्री राठोडसह अन्य व्यक्तींवर होणार कारवाई? कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी गायब झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज प्रकट झाले. त्यांच्या आगमनानिमित्त आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम …

Read More »

पूजा चव्हाण प्रकरणः मंत्र्यांसोबत तरुणीचे फोटो प्रसिद्ध होऊनही कारवाई का नाही ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई: प्रतिनिधी तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिदधी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली . विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग …

Read More »

जबरदस्तीने फि वसूली करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्याची शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा …

Read More »

राज्य सरकारकडूनही आता रिक्षा व टॅक्सी प्रवास महाग परिवहन मंत्री अनिल परब यांची दरवाढ केल्याची दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी आधीच केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता लोकल रेल्वे स्थानकापासून ते आपल्या घरी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षाचा वापर करणाऱ्या मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही आता राज्य सरकारकडून ३ रूपयाने महाग केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या …

Read More »

कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट ५ हजार २१० नवे बाधित, तर ५ हजार ३५ बरे झाले तरी १८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ७ हजाराच्या घरात रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल ३ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती मंडळात आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच नोंदविण्यात आली आहे. अकोल्यात २०० हून अधिक, तर अमरावतीमध्ये ६०० हून अधिक तर बुलढाण्यात १०० हून अधिक …

Read More »