मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना …
Read More »ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता शासकीय वसतीगृह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात असलेल्या साखर कारखान्यांच्या हद्दीतील ऊसांची तोडणी करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकिय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे शिक्षण आता विना व्यत्यय सुरु राहण्यास मदत होणार आहे. पहिल्या …
Read More »महा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर …
Read More »मोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश
नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने जाहिर करत जानेवारी २०२१ पासून याची सुरुवात केली. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेसंदर्भात असलेली कागदपत्रे, प्रशासनाच्या टिपणी सर्व काही सादर करा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मोदी सरकारला दिले. …
Read More »एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: पाच लाखांची आर्थिक मदत आणि अनुकंपा खाली नोकरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत- मंत्री ॲड. परब
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे …
Read More »शेलारांचे आव्हान… शिवसेना को परास्त करने भाजप तयार है शिवसेना पळवाटा शोधण्याचा प्रयत्नात
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. निवडणूक ही रणांगण असते आणि म्हणूनच जुन्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करुन देतो असे सांगत ते म्हणाले की, ‘बंदूक भी तेरी, गोली भी …
Read More »राज्यातील कोरोनाच्या बालरुग्णांची टक्केवारी आणि संख्या जाणून घ्या आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या …
Read More »अ,ब,क वर्गातील शहर-जिल्ह्यांमध्ये कोविड उपचारासाठी हेच दर आकारता येणार अधिसूचनेस मंजूरी देत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात …
Read More »हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला
मुंबई: प्रतिनिधी २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट असल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारला लगावला. ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी …
Read More »पदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय होईल, मी नाराज नाही… ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करत आरक्षित पदेही खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या निर्णया विरोधात काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जाहिर भाष्य करत ७ मेचा तो शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त …
Read More »
Marathi e-Batmya