मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात …
Read More »वाघांसाठी दोन गावांचे पुर्नवसन करा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे …
Read More »भाजपाचे पितळ उघडे पाडणाऱ्या ट्विटरची चौकशी, कार्यालयावर छापे व्यवस्थापकीय संचालकाला दिल्ली पोलिसांनी बोलाविले
नवी दिल्ली/ मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने टूल किट तयार केले असल्याचा आरोप भाजपाच्या संबित पात्रा यांनी केल्यानंतर सदरचे ट्विट हे मॅनिप्युलेटेड मिडिया असल्याचा शेरा ट्विटरने मारला. सदरचा शेरा काढून टाकावा यासाठी भाजपा नेत्यांबरोबर केंद्र सरकारने ट्विटरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्विटरने अद्याप या दबावाला भीक …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधानांना भेटून काय उपयोग आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच्याच अखत्यारीतच
पुणे: प्रतिनिधी खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाबाबत भेट मागितली पण ती त्यांना मिळाली नाही. मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने केंद्र सरकारची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे …
Read More »२६ मे ला १२० संघटना पाळणार “मोदी सरकार निषेध दिवस” २६ ते ३० मे दरम्यान लोकजागर आणि ३६ जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० तहसीलदारांना निवेदने देणार
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपा मोदी सरकारला २६ मे ला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र या सात वर्षात कामगार विरोधी कायदे, सरकारी कंपन्यांची विक्री, शेती व्यवसाय अदानी, अंबानीला विकण्यास सुरुवात केली असून लोकशाही व्यवस्थेतील फेडरल स्ट्रॅक्टचर मोडीत काढत असल्याच्या निषेधार्थ १२० संघटनांच्या जन आंदोलनांची संघर्ष समिती २६ मे हा दिवस …
Read More »लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित …
Read More »मोदी सरकारची सात वर्षे म्हणजे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल आणि महामारीतील अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली… नोकर्या गेल्या… लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »भाजपप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा ! काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले, पण सन्मा. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम …
Read More »विजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन
मुंबई: प्रतिनिधी आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतातील राम लक्ष्मण युगाचा अस्त झाला. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांनी मिळून संगीतकार म्हणून आपल्या …
Read More »फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …
Read More »
Marathi e-Batmya