टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सची मंगळवारी १३.३३ टक्क्यांनी वाढ होऊन तो एका वर्षातील उच्चांकी ८,२५० रुपयांवर पोहोचला, जो कंपनीने आधी जाहीर केलेल्या स्टॉक स्प्लिटसाठी भागधारकांची मान्यता मिळवून दिला. अखेर हा स्टॉक ११.८८ टक्क्यांनी वाढून ८,१४४.६० रुपयांवर स्थिरावला. गुंतवणूक फर्मने १० रुपयांच्या दर्शनी मूल्यासह प्रत्येक पूर्ण पेड-अप इक्विटी शेअरचे १ रुपये …
Read More »प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड, आयटीआर दाखल करणे झाले अवघड अंतिम तारिख जवळ येत असतानाच अडचण
१५ सप्टेंबर २०२५ रोजी प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक कंपन्या कायदेशीर अंतिम मुदतीपूर्वी आगाऊ कर भरू शकल्या नाहीत. कर निर्धारण वर्ष २०२४-२५ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख आणि आगाऊ कराच्या दुसऱ्या हप्त्याची अंतिम तारीख असल्याने पोर्टलचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. देयके अंतिम करू न शकणाऱ्या कंपन्यांना …
Read More »ओम फ्रेट फॉरवर्डर्स लिमिटेडचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये ३ ऑक्टोंबर पर्यंत सबस्क्रिप्शन करता येणार
ओम फ्रेट फॉरवर्डर्स लिमिटेड २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा प्रारंभिक आयपीओ अर्थात सार्वजनिक ऑफर लाँच करणार आहे, ज्याची सबस्क्रिप्शन विंडो ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुली आहे. कंपनीने प्रति शेअर १२८ ते १३५ रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदार किमान १११ शेअर्ससाठी बोली लावू शकतात, त्यानंतर १११ शेअर्सच्या पटीत. आयपीओमध्ये …
Read More »शरद पवार यांची चिंता, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उधवस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, असे आवाहन …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, शिवसेनेचे सर्व मंत्री करणार पूरग्रस्त भागाचा दौरा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त मराठवाड्याला मदतीचे ट्रक रवाना
राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देणार असल्याचे सांगितले. आपण स्वतः ही धारशिवचे पालकमंत्री प्रताप …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे अन्य महत्वाचे निर्णय नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज, अकोला येथील भाजी बाजार उभारणीसाठी जमिनीसह घेतले अनेक महत्वाचे निर्णय़
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली या बैठकीत नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाचे ब्रॅाडगेज मार्गाच्या रुपांतरणाला चालना, अकोला महानगरपालिकेला शहर बसस्थानक, भाजी बाजार उभारण्यासाठी जमीन, वसई-विरारला महापालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आचोळे येथील जमीन, सोलापूरच्या कॉ. साने महिला गृहनिर्माण संस्थेला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला सवलतीच्या दरात भूखंड आदी …
Read More »अंधेरीतील पटेल नगर मध्ये म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव
मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भुखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमीं देवेंद्र फडणवीस होते. अंधेरी (पश्चिम) येथील या भुखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. …
Read More »मंत्रिमंडळाचा निर्णयः बेकायदेशीर जाहिरात फलक प्रकरणी एका महिन्यात कारवाईचे आदेश घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल स्विकारला
मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास. तसेच समितीचे निष्कर्ष, व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे …
Read More »मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ५ लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर ९ आजारांवरील उपचारांसाठी निधी मिळणार जन आरोग्य योजनांच्या दाव्यांतून मिळणाऱ्या राखीव निधीचा आरोग्य हमी सोसायटीकडून विनियोग
विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांसाठी ५ लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या ९ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च राखीव निधीतून केला जाणार आहे. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा; पंचनामे व सर्वे सोडा आणि तात्काळ मदत करा
राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली …
Read More »
Marathi e-Batmya