नवी दिल्ली- मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट …
Read More »मूग, उडिदच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनो केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार …
Read More »लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम विशेष शिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन- धनंजय मुंडे
मुंबई : प्रतिनिधी शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य …
Read More »घरगुती कामगार कल्याण मंडळाला १०० कोटी द्या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्यसरकाने तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत करून राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली. देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता …
Read More »संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक मंत्री देशमुख यांचे आश्वासन
लातूर : प्रतिनिधी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. …
Read More »कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी २२ हजार रूग्ण तर बरे होण्याच्या प्रमाणात घट २२ हजार ५४३ नवे बाधित, ११ हजार ५४९ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्यादिवशी २२ हजार ५४३ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९० हजार ३४४ वर पोहोचल्याने लवकरच राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच …
Read More »संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोनु महाजनांना फोन कधी करणार ? माजी सैनिक सोनु महाजन यांना न्याय कधी मिळणार? सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही, …
Read More »मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेची घोर निराशा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादातून सामान्य जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. कोरोनाला अटकाव कसा घालणार, मिशन बिगीन अगेनची नेमकी कशी अंमलबजावणी करणार, राज्याचे उद्योग चक्र गतिमान कसे करणार, याची उत्तरे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून मिळाली नाहीत, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. राज्यात कोरोनाचे संकट अतिशय भीषण …
Read More »आजी काळजी करू नका… दोन तीन दिवसात बर्या व्हाल; ९० वर्षांच्या आजीला दिला धीर कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांची केली विचारपूस
सांगली: प्रतिनिधी “आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन – तीन दिवसात बर्या व्हाल…” असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज …
Read More »
Marathi e-Batmya