मुंबईः प्रतिनिधी राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसत असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली. मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर …
Read More »कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्यासाठी भाजपचे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य …
Read More »नुकसान सहन करत बिल्डरांच्या सोयीसाठी सरकार आणखी एक निर्णय घेण्याच्या पावित्र्यात मंत्र्याच्या उपस्थितीत बिल्डरांची झाली बैठक
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना भराव्या लागणाऱ्या प्रिमियम शुल्कात नगर विकास विभागाने आधीच घट केलेली असताना त्या शुल्कात आणखी घट करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असून यासंदर्भात बिल्डरांच्या आणि संबधित “बॉस” च्या उपस्थित आज मंगळवारी एक बैठक झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. लॉकडाऊन काळात …
Read More »त्या चार महिन्यातील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णयाची शक्यता डॉ. नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सोमवारी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या एका …
Read More »कोरोना : बाधितांपेक्षा दिड पटीने रूग्ण बरे; ९० टक्क्याहून अधिक घरी जाणाऱ्यांचे प्रमाण ४ हजार ०९ नवे बाधित, १० हजार २२५ बरे झाले तर १०४ मृतकांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधित रूग्ण संख्या पुन्हा ५ हजाराच्या आत आढळून आली असून बरे होणाऱ्यांच्या संख्येत मात्र आज दिडपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज ९०.३१ टक्के बरे होणाऱ्यांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासात ४ हजार ९ बाधित रूग्णांच्या संख्येसह एकूण बाधितांची संख्या १६ लाख ८७ हजार …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट सिंगापूर, जपानसह देशातील उद्योगपतींबरोबर ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ …
Read More »रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी …
Read More »रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ ९ तारखेपासून वाढीव वेळेत सुरु राहणार
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने गेली काही महिने आर्थिक बाजारातील व्यापारावर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. परंतु आता लॉकडॉऊनमध्ये शिथिलता आणत सर्वच गोष्टी पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आर्थिक बाजारातील व्यापारावर असलेली वेळेची मर्यादेत पुन्हा वाढ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वाढीव वेळेची अंमलबजावणी ९ नोव्हेंबर …
Read More »पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच रिक्त जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आचारसंहिता आजपासून लागू १ डिसेंबरला होणार मतदान
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर औरंगाबाद …
Read More »सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …
Read More »
Marathi e-Batmya