Editor

कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …

Read More »

साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या तथा कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. तसेच मागील काही महिन्यापासून त्या आजारी होत्या. पाचव्या लोकसभेमध्ये त्यांनी उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच त्या कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय …

Read More »

क्विन नेकलेस प्रकरणी दुटप्पीपणा उघड भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी व पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्विन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्विन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार …

Read More »

…. ही तर फडणवीसांची बौद्धीक दिवाळखोरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी स्व. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाचा कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक …

Read More »

कोरोना : बऱ्याच दिवसानंतर बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २१ हजार ६५६ नवे बाधित, २२ हजार ७८ बरे झाले तर ४०५ मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसानंतर राज्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून ते ही आतापर्यत सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले असून ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२ हजार ७८ इतकी असून घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २१ हजार ६५६ बाधित …

Read More »

एकाच दिवसात दोन मंत्र्यांना कोरोना ट्विटरवरबून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील अनेक राज्यमंत्री, मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. त्यात आ एकदम दोन कॅबिनेट मंत्र्याचा समावेश झाला आहे. यात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आहे. यापैकी मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती स्वत:  ट्विटरवरून दिली. अहवाल सकारात्मक झाल्यानंतर या …

Read More »

पुढील काही दिवसांत इंदू मिल येथे डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. त्यामुळे या स्मारकाच्या पायाभरणीचा समारंभ पुढील काही दिवसात सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. मात्र याचे राजकारण करून नका …

Read More »

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही जमावबंदी लागू ? लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या - अजित पवार

पुणे: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे …

Read More »

अंतिम वर्षाचे परिक्षा फॉर्म भरण्यास ३ दिवसांची मुदतवाढ; बॅकलॉग परिक्षा २५ तारखेपासून अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल-उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून बँकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा २५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज …

Read More »