ठाणेः प्रतिनिधी भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी सरकारी जमिनीऐवजी आमच्या खासगी जमिनी संपादीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यामुळे जमिनी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सरकारने आम्हाला बाजार भावाप्रमाणे जमिनीचा चांगला मोबदला द्यावा, अशी मागणी कोन-गोवे संघर्ष समितीने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. बाजार भावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणार नसाल तर …
Read More »भाजपाने आमदार चरण वाघमारेसह चारजणांना दाखविला घरचा रस्ता बंडखोर उमेदवारी मागे न घेतल्याने पक्षातून निष्कासित
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळेल, नाही मिळाले तर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणारे तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे, नगरसेविका गीता जैन यांच्यासह चार जणांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आमदार …
Read More »जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …
Read More »पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव …
Read More »राज्यावर ४ लाख कोटींच कर्ज केलं पण विकास किती झाला ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल
वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …
Read More »गतीमान सरकारने सांस्कृतिक खात्याला दिले पाच वर्षात १४ संचालक संचालकांची नियुक्ती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संगीत खुर्चीचा खेळ
मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाचवर्षापूर्वी गतीमान सरकार पारदर्शक सरकारचा नारा देत आलेल्या भाजपा-शिवसेनेने अगदीच गतीमान कारभार करत गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदी पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करत “संगीत खुर्चीचा” रेकॉर्ड ब्रेक खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. खात्यात अथवा एखाद्या महामंडळात किमान दोन वर्षे तरी …
Read More »इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका
अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …
Read More »आरे, नाणारला विरोध करणारी शिवसेना रत्नागिरीत पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी आग्रही रोजगार देणारी तीन हजार एकर जमिन बड्या उद्योजकाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील
मुंबईः खास प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण आणि कोकणाच्या विकासाच्या नावाखाली उध्दवस्त करणारे नाणार, जैतापूर प्रकल्प आणि मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीतील एका उद्योजकाच्या व्यवसायवृध्दीसाठी तीन हजार एकर बागायती आणि पर्यावरणाखाली असलेली जमिन उजाड करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच मराठीe-बातम्या.कॉमच्या हाती आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीच जैतापुर …
Read More »राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …
Read More »
Marathi e-Batmya