Editor

केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, महिला व बाल कल्याण विभागाचे काम चांगले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरील बैठकीत स्मृती इराणी यांचे प्रशंसोद्गार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे काढले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट …

Read More »

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …

Read More »

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी दौरा करा मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा असा उपरोधिक सल्ला देत म्हणजे त्यांना …

Read More »

केंद्र व राज्य सरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. ही वेतनवाढही दिल्ली, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगार वर्गाला खूश करण्यासाठी केलेली व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होताना जाता-जाता …

Read More »

निवडणूका आहेत, कामांसाठी ८० टक्के पर्यंतची रक्कम रिलीज करा विकास कामांच्या निधीसाठी विभागांची वित्त विभागाकडे धाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यास एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी विविध विभागांकडून वित्त विभागाकडे धाव घेण्यात येत आहे. तर वित्त विभागाकडून ८० टक्के पर्यंतचा निधी या विभागांना देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याचा …

Read More »

“हौस पुरवा महाराज, मला आणा एक १५ लाखाची गाडी” दोन महिन्यासाठी मंत्रीपद मिळूनही मंत्र्यांचा नव्या गाडीसाठी अट्टाहास

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत १३ नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला. मात्र या सर्वच मंत्र्यांना अवघा दोन महिन्याचा कालावधी मिळणार असताना यातील काही मंत्र्यांनी नव्या चारचाकी वाहनासाठी आपल्याच विभागाकडे हट्ट धरल्याची माहिती नुकतीच पुढे आली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कँबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश …

Read More »

धनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्या- मेंढी गटाचे वाटप पदुम मंत्री महादेव जानकर यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी बंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ.ज.क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज दिले. महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या स्वरुपाच्या …

Read More »

हसन मुश्रीम यांच्या घरावरील छाप्याचा राष्ट्रवादीकडून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि पुणे येथील त्यांच्या मुलांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यामुळे सरकारकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सच्चा नेत्याला भय दाखवायचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, सरकारी निवेदनाला बगल देणाऱ्या तसेच …

Read More »

निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा सेनेत प्रवेश आम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करण्याची राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

आणि राष्ट्रवादीचे घड्याळ उलटे फिरू लागले उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पाच वर्षापूर्वी शिवसेना, भाजपानंतर काँग्रेसमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकिय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा शोधला. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून आपले राजकिय अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्यापाठोपाठ मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत …

Read More »