Editor

आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद – वाशीः प्रतिनिधी ‘अ’ गेला तर ‘ब’ आहे आणि ‘ब’ गेला तर ‘क’ आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जाणारे खुशाल जावू देत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत मांडली. येत्या निवडणुकीत कुणी …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी विरोधकांवर टीकास्त्र

जळगांवः प्रतिनिधी निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो म्हणणाऱ्या बुद्धू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी ते सभेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव …

Read More »

देशाची अर्थव्यवस्था मंदीची असेल पण महाराष्ट्राची नाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असल्याचे मत व्यक्त केले. परंतु महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून राज्याच्या जीएसटीच्या उत्पन्नात कोणत्याही स्वरूपाची घट झालेली नसल्याचे सांगत मंदीचे सावट एकट्या भारतावरच नाही तर जगावर असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आर्थिक मंदीची परिस्थिती देशातच नव्हे तर …

Read More »

प्रायोगिक रंगभूमीसाठी जानेवारी २०२० पासून नवा रंगमंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रंगमच निर्मितीचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी प्रायोगिक रंगभूमीसाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील रंगमंच येत्या जानेवारी २०२० पासून सुरु होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज सकाळी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य …

Read More »

अर्थव्यवस्था सुधारा, नाहीतर लाखो बेरोजगार होतील नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारांच केंद्राला आवाहन

नवी दिल्लीः प्रतिनिधी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिवसेंदिवस घरघर लागत असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोसपणे काही तरी करण्याची गरज असून केंद्र सरकारने याकडे पहावे असे आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केंद्राला करत नाही तर लाखो बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. मागील ७० वर्षात अशी …

Read More »

आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ करणार हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस निसर्ग आणि हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलाचा काय परिणाम …

Read More »

त्या घोटाळ्याशी माझा संबध नाही निवडणूका आल्याने आदेश आणि नोटीसा आल्याचा अजित पवारांचा दावा

परभणी- पाथरीः प्रतिनिधी पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा यत्किंचितही संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस… असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा. परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे …

Read More »

देहव्यापारातील भगिनींकडून पूरग्रस्तांना ११ हजाराची मदत स्नेहालयाच्या मदतीने भगिनीचा पुढाकार

अहमदनगर: प्रतिनिधी देहव्यापारातील बळी महिलांतर्फे कोल्हापूर, सांगली ,बेळगाव भागातील पूरग्रस्तांसाठी आज ११ हजार रुपयांचा आर्थिक सहयोग देण्यात आला.यात ३ हजार रुपये रोख तर ८ हजार रुपये धनादेशाद्वारे शासनास देण्यात आले. यापूर्वी स्नेहालय-अनाम प्रेम परिवाराने पूरग्रस्त भागात २ ट्रकद्वारे पाठविलेल्या आणि वितरित केलेल्या वस्तुरूप सहयोगात ६० हजार रुपयांचा किराणा या महिलांनी …

Read More »

खासगी जमिनीवरील अतिक्रमणधारकही होणार घराचे मालक जमिन पट्टेवाटपासाठीच्या कार्यप्रणालीस राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबईः प्रतिनिधी सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची शीघ्रतेने अंमलबजावणी करण्यासाठी खासगी जमिनीवरील अत‍िक्रमणधारकांनाही आता त्याच जमिनीची मालकी मिळणार आहे. तसेच अतिक्रमणधारकांना सर्वांसाठी घरे या योजनेतून घरेही मिळणार असून त्यासाठी जमिनीचे पट्टेवाटप करण्यासाठी कार्यप्रणाली निश्च‍ित करण्यात आली असून त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागरी स्थान‍िक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात …

Read More »

खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी अमृतची स्थापना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज समुहातील तरुणांच्या विकासासाठी …

Read More »