Editor

महसूल विभागातील संगणक माहिती चोरीमागे बदली-बढतीतील दलालांची लॉबी बदल्यांच्या टेबलवर मंत्र्यांच्या मर्जीतील पदमुक्त न झालेले अधिकारी

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या बढत्या आणि बदल्यांची प्रक्रिया सध्या महसूल विभागात सुरु आहे. मात्र या बदल्या आणि बढत्या प्रक्रिया ज्या टेबलवर सुरु आहेत. त्या टेबलच्या कार्यकक्षेच्या संगणकातील माहितीची चोरी झाल्याने या चोरीमागे दलालांची लॉबींग तरी कारणीभूत नाही …

Read More »

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच माहितीची चोरी? इन्फोटेक कंपनीच्या एकास अटकः पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mantralay

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महसूली कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील महसूल विभागात महसूली अधिकाऱ्यांच्या बदली-बढतीचा मोसम सुरु आहे. या मोसमातच मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागातील माहीतीची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील संपूर्ण महसूली अर्थात जमिनी, महसूली उत्पन्न अर्थात कर संकलन, रेडीरेकनरमधून मिळणारे उत्पन्न आदींची माहिती मंत्रालयातील महसूल विभागात आहे. …

Read More »

शरिफन…. सआदत हसन मंटो यांच्या कथेचा संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांनी केलेला स्वैर अनुवाद

बाहेर चाललेल्या नरसंहारातून वाचत कासीम कसाबसा घरापर्यंत पोहचला. त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसली होती. त्यामुळे तो तडफडत होता, विव्हळत होता. घराचा दरवाजा उघडताच क्षणी त्याला त्याच्या बायकोचा मृतदेह नजरेस पडला, फातिमा…. जीवाच्या आकांताने ओरडून तिच्याजवळ गेला. उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची तडप आता तो विसरला आणि सूडाने पेटून उठला, …

Read More »

राज्यातील बेरोजगारीने गाठली परिसीमा; ३२ हजार जागांसाठी ३२ लाख अर्ज सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्योग क्षेत्र संकटात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी आर्थिक मंदीची झळ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रालाही बसलेली असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट ओढवले असून सरकारने लक्ष घालून या मंदीची झळ कामगारांना बसणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी …

Read More »

कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट मेट्रो भवन कंत्राट घोटाळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात हजारो कोटींची कंत्राटे वाटली जात असताना मोठमोठ्या कंत्राटांवर सरकारच्या मर्जीतील काही विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राटे देताना केंद्रीय दक्षता आयोगाची मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवून काही खास कंत्राटदारांसाठी नियम वाकवल्याचे दिसून येत आहे. हे क्रोनी कॅपिटालिझमचे मूर्तीमंत उदाहरण असून पारदर्शक म्हणवणा-या सरकारचा भ्रष्ट चेहरा दाखविणाऱ्या या टेंडर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी …

Read More »

१ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना देणार दप्तरे कोल्हापूरात ४९ हजार तर सांगलीत २८ हजार विद्यार्थ्यांना दप्तरे देणार

मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार …

Read More »

काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्तेतील मुजोरी लोक विसरले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

अ.नगर-पाथर्डीः प्रतिनिधी भाजपाच्या महाजनादेश यात्रेसोबत राज्यात अनेक यात्रा निघाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन यात्रा आहेत तर काँग्रेसची एक यात्रा सुरू होत आहे. त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्यांच्या यात्रांना जनता प्रतिसाद देत नाही. कारण पंधरा वर्षे सत्तेत असताना त्यांनी केलेली मुजोरी लोक विसरलेले नाहीत. तुम्ही पंधरा वर्षे त्रास दिलात म्हणून मतदारांनी …

Read More »

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद …

Read More »

शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती करणार चार दिवस आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती आणि लाक्षणिक उपोषण करणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शासकिय व निमशासकिय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला. तसेच ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक संपही कर्मचाऱ्यांकडून करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मागील १४ वर्षापासून जूनी पेंशन योजना करावी, सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर …

Read More »

सोलापूरातील राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेना-भाजपात माढ्यात कमळ तर बार्शीत धनुष्यबाण

सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना गळाला लावण्याचे काम केले. आता आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपा-शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना पक्षात ओढण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे लवकरच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अंत्यत जवळचे माढ्याचे …

Read More »