Editor

स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी व्यावसायिकांनी प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर २४ तासात ताप कमी न झाल्यास …

Read More »

आरोग्य सांभाळयचे तर आहारात फळे महत्वाची रोज फळे खाल तर आरोग्य टीकेल

आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन – प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन …

Read More »

एससी-एसटीला पदोन्नतीत आऱक्षण देण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने मागासवर्गीय आणि आदीवासी कर्मचाऱ्यांमध्ये आशादायक वातावरण

नवी दिल्लीः प्रतिनिधी शासकिय सेवेतील एससी, एसटी समाजातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र राज्य आणि केंद्र सरकारची इच्छा असेल तर एससी-एसटी समुदायातील शासकिय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देवू शकतात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने दिला. तसेच २००६ चे नागराज खटल्यातील …

Read More »

मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख

सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. …

Read More »

मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बनावे सरकार प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय–रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत मराठा तरूणांनी नोकऱ्या …

Read More »

बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी दहावी पर्यंतच्या …

Read More »

शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे …

Read More »

लग्नाला जा पण पेट्रोल, डिझेल आहेर द्या राज्यातील पेट्रोल नव्वदी पारवर काँग्रेसचे अनोखे आंदोलन

ठाणेः प्रतिनिधी पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत 80 रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई …

Read More »

द्राक्ष बागायतदार संघाचे कार्य आता शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे द्राक्षसंघाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा मांडणारा अभिजित झांबरे यांचा लेख

पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्रदादा पवार तर उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. त्याचसोबत इतर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीस या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करीत असतानाच त्यांच्या …

Read More »

म्हाडा, एसआरए इमारतींच्या पुर्नविकासासाठी आता ५१ टक्क्याची अट मुंबईसाठीच्या सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांनाही राज्य सरकारची मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33 (5), 33 (7), 33 (10) या नियमानुसार विकसित करावयाच्या प्रकरणांत 51 टक्के संमतीची अट समाविष्ट केली आहे. जेणेकरुन म्हाडाच्या जुन्या इमारती, उपकर प्राप्त इमारती, झोपडपट्ट्या यांचा पुनर्विकास सहजतेने होऊ शकेल. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खाजगी अनआरक्षित जागांवर संक्रमण शिबीर (Transit camp) उभारण्याची तरतूद केली असून …

Read More »