Editor

भाजपामधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आमदार डॉ. देशमुखांचा राजीनामा पक्षांतर्गत असलेली धुसफूसीमुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या तयारीत

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आपले राजकिय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आयाराम रांगेत आहेत. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची सुरुवात झाली असून भाजपचे नागपूर जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी आपल्या आमदाराकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे आज दिला. लवकरच …

Read More »

सरकारला दूर करण्याचे पहिले पाऊल शेतकरी वर्गातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी या देशातील शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळे चिडून दिल्लीमध्ये पोलिसांनी अतिरेकी कारवाई केली आणि शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु देशातील शेतकरी नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला घाबरणार नाही आणि समर्थपणे एकत्र येवून हे सरकार दूर करण्याचे पहिले पाऊल टाकेल असा विश्वास …

Read More »

सरकारच्या असत्य, हिंसा आणि अशांती तत्वांविरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत्त राज्यभर राष्ट्रवादीने धरणे आणि मौनव्रतातून साधला सरकारवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज मंत्रालयाजवळ असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर तोंडाला काळी फित बांधून मौनव्रत घेत धरणे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधीजींची तत्वे आणि सत्ताधारी भाजप सरकारची आत्ताची तत्वे या फलकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या जवाब दो मोहिमेतील प्रश्नांचे फलकही याठिकाणी लक्ष वेधून घेत होते. सुरुवातीला महात्मा …

Read More »

म.गांधींच्या जयंती दिनीच मंत्रालयात स्वच्छतेचे तीन तेरा लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची दुरावस्था

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. …

Read More »

संभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या ! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील …

Read More »

जनसहभागामुळे महाराष्ट्र राज्य हागणदरी मुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत प्रतिपादन

नवी दिल्ली: प्रतिनिधी राज्य शासनाचा पुढाकार व जनतेच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीणक्षेत्र पूर्णपणे हागणदारी मुक्त झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत केले. २०१९ अखेर राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला घर व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उदिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय …

Read More »

भीम आर्मीचे नेते अँड . चंद्रशेखर आझाद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात पाच सभा घेणार

मुंबईः प्रतिनिधी सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ कारावासातून मुक्त झालेले भीम आर्मी या संघटनेचे नेते ऍड चंद्रशेखर आझाद लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत .भीम आर्मी सामाजिक संघटना आणि अराजकीय संघटना असली तरी येत्या काळात किंगमेकरच्या भूमिका पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. …

Read More »

झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आंदोलन महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर बसून मुक आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे …

Read More »

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही? विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. प्रभादेवी अर्थात जुन्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष झाल्याच्या अनुषंगाने …

Read More »