नाणार : प्रतिनिधी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन …
Read More »मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांची जयंती उत्साहात साजरी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची उपस्थिती
मुंबई : प्रतिनिधी आपल्या देशात चलचित्राची मुहूर्तमेढ रोवत चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती मराठी कलाकार-तंत्रज्ञांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. दादर येथील दादासाहेब फाळके चौकात जयंती साजरी करण्यासाठी जमा झालेल्या कलाकारांना पाहण्यासाठी रसिकांनीही खूप गर्दी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट …
Read More »“लुटता कशाला फुकटच न्या की” म्हणत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा यल्गार सात दिवस आंदोलन करण्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा
अहमदनगर : प्रतिनिधी लुटता कशाला फुकटच न्या असा संताप व्यक्त करत ग्रामसभेचा पहिला ठराव करणा-या औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावात सकाळी भजन कीर्तन करत दुध सरकारला फुकट देत ३ मे रोजी व अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनच्या पूर्वसंध्येला दगडाच्या सरकारवर दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे. यावेळी डॉ.अजित नवले, धनंजय धोरडे, …
Read More »संगीत देवबाभळी ने पटकाविले प्रथम पारितोषिक ३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित
मुंबई : प्रतिनिधी ३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे- सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या अनन्या या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिकआणि त्रिकुट, मुंबई या संस्थेच्या वेलकम जिंदगी या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.अन्य निकाल पुढीलप्रमाणे:- दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक …
Read More »संभाजी भिडेच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश दिपक पवार
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील दलित समुदायाच्या विरोधात दंगल घडविल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीसाठी एका दलित कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर दलित कार्यकर्ता हा रिपब्लिक सेनेचा कार्यकर्ता असून गणेश दिपक पवार असे नाव असल्याचे समजते. संपूर्ण …
Read More »नयना मुकेला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने गौरव
मुंबई : प्रतिनिधी तसं पाहिलं तर कोणताही लहान मोठा पुरस्कार त्या व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जा प्रदान करीत असतो. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळणं म्हणजे आनंदाला पारावारच उरत नाही. अभिनेत्री नयना मुके सध्या हा आनंद अनुभवतेय. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने …
Read More »शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, बेराजगारांना नोकऱ्या आणि बेघरांना घरे देणार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी निर्णयांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पुर्नउच्चार
मुंबई : प्रतिनिधी कर्जमाफीपासून वंचीत राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढीलवर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे बांधण्याचा मनोदय तसेच पुढील पाच वर्षात एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाचा पुनरूच्चार करीत …
Read More »भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर …
Read More »डिजीटल ७/१२ देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागात ७/१२ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पदोपदी याची आवश्यकता भासत असते. प्रत्येक गोष्टीसाठी सातबारा लागतो. गावामध्ये सातबारा मिळणे आणि तोही फेरफार करून मिळणे हे दिव्य असायचे. पण आता डिजिटल स्वरुपातील व स्वाक्षरी असलेला ७/१२ मिळणार असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सध्या ४० हजार गावातील …
Read More »अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांना मिळाले जीवानाचे साथीदार वधू-वर मेळाव्यात ४०० जणांनी नोंदविला सहभाग
अहमदनगर : प्रतिनिधी समाजात पालक असूनही अनेक सदृढ व्यक्तींचे विवाह होत नाहीत. मात्र समाजात आणि जगात ज्यांचे कोणी नाहीत अशासाठी स्नेहाच्या अर्थात प्रेम आणि मैत्रीच्या भावनेतून अनामप्रेमाच्या मायेतून त्यांचा सांभाळ करणे आणि त्यांना मनुष्य म्हणून जगायला समर्थपणे उभे करणाऱ्या स्नेहालयच्या अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांचा विवाह काल रविवारी २९/०४/२०१८ रोजी पार …
Read More »
Marathi e-Batmya