मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सर्व मिलच्या जागा महापालिका, म्हाडा आणि गिरणी कामगारांना समसमान पध्दतीने वाटप करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला. परंतु त्यात चालबाजी करत तेव्हाच्या सरकारने एकूण जागेऐवजी उर्वरित रिकाम्या जागेचे तीन भाग करून त्याचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याच पध्दतीने कमला मिलच्या जागेबाबत निर्णय घेतला. त्यामुळे कमला मिल परिसरातील …
Read More »शेतकरी कर्जमाफीवरून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करण्याची विरोधकांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आणखी वाढीव मुदत दिली. त्यामुळे या सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी असल्याने कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधकांनी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी …
Read More »मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन
मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »काय असते तबलिगी इज्तेमा? औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर
औरंगाबाद : जगदीश कस्तुरे नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत “तबलिगी इज्तेमा” सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने …
Read More »अनुवाद प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले. विधिमंडळ सदस्यांच्या संयुक्त बैठकीपुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण संपल्यानंतर त्यावरचे पडसाद विधान परिषदेत कामकाज सुरू होताच उमटले. कामकाजाला सुरूवात होताच …
Read More »‘दादा – बाबा’चा एकाच गाडीतून प्रवास… राजकिय विरोधक असूनही एकाच गाडीतून प्रवास
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार क्वचितच एकत्र दिसतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका काढत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची चांगलीच अडचण केली. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच राजकिय शत्रुत्व निर्माण झाले होते. मात्र अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा यांनी आज …
Read More »राज्यपालांच्या भाषण अनुवाद वाचनाचे १० हजार कोणाला? श्रीपाद केळकर कि शिक्षण मंत्री तावडे यांना
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषण होते. या अभिभाषणाचा अनुवाद वाचण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला पाचारण करून त्याच्या तोंडून अनुवादीत भाग वाचला जातो. मात्र राज्यपालांचे अनुवादीत अभिभाषण वाचण्यासाठी बोलविण्यात आलेल्या श्रीराम केळकर ऐवजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी वाचन केल्याने अनुवाद वाचणाऱ्या …
Read More »कर्जावरील व्याज भरण्यासाठी २१०० कोटींची पुरवणी मागण्यात तरतूद अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ हजार ८७१ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई: प्रतिनिधी राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर, महसूली उत्पन्नातील कमतरता आणि शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम उभी करता राज्य सरकारला चांगलेच नाकी नऊ आलेले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच थकीत कर्जावरील २ हजार १२९ कोटी रूपयांची व्याजाची रक्कम भरण्यासह इतर काही विभागांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …
Read More »श्रीदेवी यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात? शवविच्छेदनात अपघाती मृत्यूची नोंद : ‘चांदणी’ला शेवटचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटीजची गर्दी
मुंबई: प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दुबईहून धडकली आणि बॅालिवुडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना जणू ‘सदमा’च बसला. श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे काल दिवसभर आणि आज दुपारपर्यंत सांगितले जात होते; परंतु शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे यावर …
Read More »मे २०१८ पर्यंत १५ हजार गावे दुष्काळ मुक्त करणार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी मे २०१८ पर्यंत राज्यातील आणखी १५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचा दावा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर अभिभाषण करताना …
Read More »
Marathi e-Batmya