Editor

व्यापार वृद्धीसाठी पियुष गोयल पाच दिवस युरोपच्या दौऱ्यावर केंद्रीय व्यापार आणि औद्योगिक संबध मजबूत करण्याचा प्रयत्न

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्वित्झर्लंडमध्ये आहेत, ते युरोपातील दोन शीर्ष नवोन्मेष केंद्रांशी व्यापार आणि औद्योगिक संबंध मजबूत करण्यासाठी पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू केल्या आहेत, जिथे ते औषधनिर्माण, जीवन विज्ञान, अचूक अभियांत्रिकी, मशीन टूल्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक सीईओ आणि …

Read More »

पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास

भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती …

Read More »

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व आचार आदर्श मानून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी  भव्य दिव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार  ३५२ वा …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार यादी दिल्याच्या तारखा जाहिर करेल का? महाराष्ट्र आणि हरियाणासंदर्भातील मतदार यादी दिल्याच्या नेमक्या तारखा सांगा

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास लेख लिहित निवडणूक आयोगाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा अशी सूचना केली. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील …

Read More »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा

लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …

Read More »

विश्वास उटगी यांचा आरोप, आरबीआयच्या पतधोरणामुळे कर्ज वाढीला चालना, पण ठेवीदारांचा बळी पतधोरणावरून काँग्रेस नेते व बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांची टीका

रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी आपले नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६% वरून थेट ५.५% इतका अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात अपेक्षित धरत असताना रिझर्व्ह बँकेने अधिक आक्रमक भूमिका घेत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी आकडेवारी नुसार, देशाचा जीडीपी GDP वाढीचा दर …

Read More »

राज ठाकरे यांची मागणी, मुंबई रेल्वेसाठी वेगळं महामंडळ हवं, सरकार लक्षच देत नाही मुंबईत येणारे लोंढे मोठे, रस्ते, पूल, त्यांच्यासाठीच शहराचं नियोजन विस्कटलं

मुंब्रा स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून ७ ते ८ प्रवाशी पडल्याची दुर्देवी घटना घडली. तसेच या घटनेत ५ प्रवाशांच्या मृत्यू झाला. या घटनेवरून मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत राज्यातील भाजपा सरकार आणि मध्य रेल्वेवर आरोप आणि टीकेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारचे बळी निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा

ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …

Read More »