सोमवारी एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनलिस्टेड शेअर्सनी २,१०० रुपयांचा उच्चांक गाठला, ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतीक्षित आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगच्या आधी त्यांची मजबूत वाढ सुरू राहिली. वेल्थ विस्डम इंडियाच्या मते, नवीनतम मूल्यांकनानुसार एक्सचेंजचे बाजार भांडवल (एम-कॅप) सुमारे ५.२ लाख कोटी रुपये आहे. वेल्थ विस्डम इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक …
Read More »भारताबरोबरील व्यापारात अमेरिका तोट्यात नाही तर ८०-८६ अब्ज डॉलर्सच्या नफ्यात संरक्षण उत्पादन विक्री ते वित्तीय सेवांमधून अमेरिकेला मिळतो नफा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान, एका परिचित भाषणात दावा केला होता की अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट १०० अब्ज डॉलर्स आहे. खरा आकडा त्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे – आणि तोही संपूर्ण सत्य सांगत नाही. वस्तू आणि सेवांच्या आकडेवारीनुसार २०२५ च्या आर्थिक वर्षात अमेरिकेला ४४.४ अब्ज डॉलर्सची तूट दिसून येत असली …
Read More »या तीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी कॉलेजियमची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाचा समावेश
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी (२६ मे २०२५) उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या नावांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि ए.एस. ओक यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाची कार्यक्षम संख्या ३१ पर्यंत कमी झाली आहे. ९ जून रोजी …
Read More »११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व सहायता केंद्राचीही
इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती (माध्यमिक व …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न
राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …
Read More »बंदींसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि कारागृह विभागाकडून प्रयासला मुदतवाढ “प्रयास” मुळे हजारो बंदींच्या जीवनामध्ये होतोय सकारात्मक बदल
कारागृहातील बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कारागृह विभाग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा कार्यक्रम बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प म्हणून ओळखण्यात येतो. ‘प्रयास’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येतो. …
Read More »अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल
कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही
मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …
Read More »अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश… नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा
पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. दरम्यान, राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya