भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे …
Read More »नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सत्ताधाऱ्यांनी जिकला, पण विरोधकांना बोलू न देता फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा आणून प्रस्ताव जिंकला
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याच्या विरोधात आणि त्यांच्या पक्षपाती वागण्यावरून विरोधी पक्षाच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी उपसभापती गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आज चर्चेला आणण्यात आला. मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधकांनाच या विषयावर बोलू न देता सत्ताधारी …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर भारताच्या निर्यातीत प्रचंड घट, अमेरिकेच्या दबावापुढे मोदी सरकारची शरणागती, ईव्हीवरचा कर ११५ टक्क्यावरून १५ % वर
देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात …
Read More »घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ मंत्री इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती
राज्यात राबविल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते. या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले असून त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, ५० तृतीयपंथीयांना विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार तृतियपंथियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा तृतियपंथियांची आघाडी गठित करणार
वंचित, उपेक्षित वर्गांची सर्वांगीण उन्नती तसेच त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्याचे लक्ष्य ठेवून भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून समाजातील उपेक्षित अशा तृतियपंथी समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच भाजपातर्फे तृतियपंथीयांची आघाडी गठित करण्यात येईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपा प्रदेश …
Read More »अकोलातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती
अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मल वाहिन्या टाकण्याचे काम मंजुरी प्राप्त व स्थगित ९६ रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहे. या मलनिःसारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. …
Read More »नागपूरातील हिंसक प्रकरणानंतर औरंगजेबाची कबर आता नो ड्रोन झोन सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात पोलिस करणार कारवाई
मुघल शासक औरंगजेबाची कबर उघडून फेकून द्या म्हणून दोनच दिवसांपूर्वी नागपूरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद त्याच रात्री उमटत हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल शासक औरंगजेबाची कबर “नो ड्रोन” झोन म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घोषित केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने …
Read More »एलआयसीचा विमा आता आरोग्य विमा क्षेत्रातही लवकरच आरोग्य विमा बाजारात उतरणार
भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसी LIC ने मंगळवारी आरोग्य विमा क्षेत्रात त्यांच्या संभाव्य प्रवेशाच्या मीडिया वृत्तांना अधिकृतपणे दुजोरा दिला. नियामक फाइलिंगमध्ये, जीवन विमा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे की, “…आम्ही येथे स्पष्ट करतो की भारतीय जीवन विमा महामंडळ (महामंडळ) आरोग्य विमा बाजारात कॉर्पोरेशनचा ठसा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिस्सा मिळविण्यासाठी …
Read More »घटस्फोटित व विभक्त महिलांना पेन्शनचा हक्क केंद्र सरकारकडून नियमावरीलंवर काम सुरु असल्याची केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
महिलांसाठी आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, सरकारने त्यांच्या कुटुंब पेन्शन नियमांमध्ये सुधारणा केली आहे. घटस्फोटित किंवा विभक्त झालेल्या मुलीला कायदेशीर निर्णयाची वाट न पाहता थेट तिच्या मृत वडिलांच्या पेन्शनचा दावा करणे शक्य आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलेल्या बदलांमुळे आता घटस्फोटित किंवा विभक्त झालेल्या मुलींना न्यायालयाच्या …
Read More »एसबीआयने एअर इंडिया आणि सिम्पलीक्लीक क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईट कमी हा नवा बदल ३१ मार्च ते १ एप्रिल दरम्यान लागू होणार
एसबीआय कार्डने त्यांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड स्ट्रक्चर्समध्ये आगामी बदलांची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या सिम्पलीक्लिक आणि एअर इंडिया को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील निवडक व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची जमा कमी होईल. हे बदल ३१ मार्च २०२५ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान लागू होतील. १ एप्रिल २०२५ पासून, सिम्पलीक्लिक एसबीआय कार्ड वापरून स्विगीवर ऑनलाइन …
Read More »
Marathi e-Batmya