Editor

आग लागल्यामुळे दक्षिण कोरियात आणिबाणीची स्थिती जाहिर देशभरात एकाचवेळी आगी लागल्याने मोठे नुकसान

दक्षिण कोरियाने आगीमुळे आगी लागू राहिल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आणि शेकडो लोकांना घरे रिकामी करण्यास भाग पाडल्यामुळे आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. “देशभर एकाच वेळी लागलेल्या वणव्यांमुळे झालेल्या मोठ्या नुकसानाला” प्रतिसाद म्हणून, विशेषतः उत्तर आणि दक्षिण ग्योंगसांग प्रांत आणि आग्नेय शहर उल्सानमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. कोरिया …

Read More »

अखिलेश यादव यांचा सवाल, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळच्या घटनेची माफी मागणार का? राजपूत शासक राणा सांगा, देशद्रोही, वक्तव्याचे अखिलेश यादव यांच्याकडून समर्थन

समाजवादी पक्षाचे खा रामजीलाल सुमन यांनी राज्यसभेत बोलताना राजपूत शासक राणा सांगा हा देशद्रोही असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे समर्थन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी समर्थन करत त्यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना “देशद्रोही” म्हटले होते. अखिलेश यादव यांनी टीका फेटाळून लावत असा युक्तिवाद केला की जर …

Read More »

आता अजित पवार यांनीच केलं स्पष्ट, लाडक्या बहिणींचा लाभ या महिलांना मिळणार हप्ताही वाढीव देणार असल्याची दिली माहिती

मागील काही दिवसांपासून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या योजनेतून अनेक महिलांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त पुढे येत होते. तसेच अनेक महिलांना या योजनेतून कमी करणार असल्याची चर्चाही वेळोवेळी रंगत होती. इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा वाढीव हप्ताही देणार असल्याचे चर्चा यावेळी सुरु झाली होती. …

Read More »

राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपविली नवी जबाबदारी मनसेतील पक्षांतर्गत नव्या पदांची निर्मितीही केली जाहिर

आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने या निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरु आहे. तसेच पक्ष बांधणीच्या उद्देशाने पक्षाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षात नव्याने पद निर्मित करत त्याची जबाबदारीही काही जणांवर सोपविली आहे. मनसे प्रमुख राज …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाचा घेतला आढावा

देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, आता वाहन चालवताना मोबाईल बघणाऱ्यांवर होणार कारवाई नवी नियमावली आणणारः बस चालवत मोबाईल वर मॅच बघणाऱ्या चालकाला एसटीने केले बडतर्फ

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे. २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी

नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. संजय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, नाशिकला नवा पालकमंत्री देणार नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार

मागील अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्र्याचा वाद भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सुरु आहे. शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तर नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद गिरिष महाजन यांच्याकडे देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला नवा पालकमंत्री देणार असल्याची घोषणा करत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतचा …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, अल्पसंख्यांकांचे धार्मिक अधिकार कायमचा काढून घेण्याचा प्रयत्न परंपरागत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न

काँग्रेसने रविवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संविधानावर “आणखी एक हल्ला” असल्याचा आरोप केला. २७ फेब्रुवारी रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने प्रस्तावित केलेल्या सर्व १४ बदलांसह सुधारित वक्फ विधेयकाला मंजुरी दिली. काँग्रेस खासदार आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी …

Read More »

बेहिशोबी रक्कम प्रकरणः न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा खुलासा, रक्कम-चलन दिसून आले नाही घरकाम करण्याच्या हवाल्याने दिले स्पष्टीकरण

१४-१५ मार्चच्या रात्री त्यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत जळलेल्या चलनाच्या वड्या सापडल्या आणि काढून टाकल्याच्या दाव्याला उत्तर देताना, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा म्हणाले की, आग लागल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना तेथे रोख रकमेचे कोणतेही अवशेष दाखवले गेले नाहीत. न्यायाधीश यशवंत वर्मा पुढे म्हणाले की, “मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली तेव्हा …

Read More »