Editor

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, मोर्चा हिंसक बनला म्हणून एखाद्याच्या विरूद्ध कारवाई नाही मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणी वैयक्तीक खटला चालविण्यास नकार

एखाद्या व्यक्तीने राजकीय रॅलीत भाग घेतला आणि नंतर ती हिंसक झाली म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक अटक प्रक्रिया सुरू करण्याचा आधार राहणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची सुटका करण्याचे आदेश देताना म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विभा कंकणवाडी …

Read More »

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विकसित भारत २०४७ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात सरकारची माहिती, जामीनासाठी वेगळा कायदा आणणार नाही भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतंर्गत केंद्राची न्यायालयात माहिती

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (बीएनएसएस) मधील तरतुदी पुरेशा असल्याने जामिनावर वेगळा कायदा आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सतेंद्र कुमार अंतिल विरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरो या २०२२ च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जामिनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वेगळा जामिन कायदा आणण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. …

Read More »

सरकारने पाठ्य पुस्तकात नोटबुकची पाने समाविष्टचा निर्णय बदलला राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०२३-२४ पासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता अपेक्षित लाभ न मिळाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापूर्वीप्रमाणेच, पाठ्यपुस्तके बाह्य पानांशिवाय दिली जातील. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी या संदर्भात शासन …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, …

Read More »

सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुंबई उपनगरांना ‘मिनी बांग्लादेश’ बनू देणार नाही मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न : लोढा यांच्या महत्वाच्या सूचना

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. यावेळी सह पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याची सुरक्षा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या सूचना केल्या. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मुंबईचे आकर्षण बाळगून विविध मार्गाने होणारी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे …

Read More »

६०व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, दमानियांनीं दिलेली कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो पण… चौकशी झाल्यानंतर पुढे काय येते त्यानंतर पुढील निर्णय

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. त्यातच या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबधाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तसेच संतोष हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच …

Read More »

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची …

Read More »

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मागील …

Read More »