Editor

राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव, प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन रद्द करा प्रशांत कोरटकर तपासात सहकार्य करीत नाही

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांना कोल्हापूर येथील कनिष्ठ न्यायालयाकडून मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. कोरटकर तपासात सहकार्य करीत नसल्याचा दावा राज्य सरकारने जामीन रद्द करण्याची मागणी …

Read More »

दादाजी भुसे यांचे आदेश, आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप करा शाळांना पूर्वकल्पना देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प शपथविधीच्या वेळी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नाही

महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …

Read More »

नाना पटोले यांची टीका, महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट सराकरने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले

महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. अर्थसंकल्पावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, शेतकरी महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणार पोकळ अर्थसंकल्प महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार

आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा …

Read More »

अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणीसाठी कोणतीही घोषणा नाही, पण वाहनांवरील करात वाढ अर्थसंकल्पातून शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी

आधीच्या सर्व अर्थमंत्र्यांचे रेकॉजर्ड तोडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ११ व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाच्या जीवावर महायुती सरकार आले, त्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर २१०० रूपयांची घोषणा करूनही त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून केलीच नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा कमी …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, १ लाख ३५ हजार कोटी तूटीचा अर्थसंकल्प तर राजस्व तूट ४५ हजार कोटीः ७ लाख कोटींचा अर्थसंकल्प

सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये महसूली जमा अपेक्षित होती. महसूली जमेचे सुधारित अंदाज ५ लाख ३६ हजार ४६३ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. सन २०२४-२५ च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपये व सुधारित अंदाज ६ लाख ७२ …

Read More »

अर्थसंकल्पातून स्मारके, घरे, महामंडळे, विभागनिहाय निधींची अजित पवार यांच्याकडून घोषणा शिवाजी महाराजांचे स्मारकाची घोषणा पण निधी नाही

राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात घोषित स्मारकाशिवाय काही नव्या स्मारकांची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी घरे याेजनेखालील धोरण नव्याने जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर विभाग निहाय निधींचे वाटप करत दिव्यांगासाठी आणि असंघटीत कामगार आणि शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच …

Read More »

आता थांबणार नाही,..असे अजित पवार यांनी सांगत अर्थसंकल्पात पुणे, मुंबई, ठाणेसाठी केल्या या घोषणा उन्नत मार्ग, विमानतळ नव्याने उभारणार असल्याची केली घोषणा

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना  मी वंदन करतो. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर …

Read More »