महाकुंभमेळ्यातील प्रवाशांच्या गर्दीत विमान भाडे वाढल्याने, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हस्तक्षेप केला आहे आणि विमान कंपन्यांना किंमती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रयागराज विमानांच्या तिकिटांचे दर “अत्यंत जास्त” असल्याचे म्हटले आहे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. नागरी विमान वाहतूक …
Read More »एमएसएमईसाठी केंद्र सरकार देणार १०० कोटींचे कर्ज केंद्र सरकारची म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्किम
एमएसएमई (एमसीजीएस-एमएसएमई) साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्किम सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. ही योजना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (एनसीजीटीसी) कडून सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांना उपकरणे/यंत्रसामग्री खरेदीसाठी पात्र एमएसएमईंना मंजूर केलेल्या १०० कोटी रुपयांपर्यंतच्या क्रेडिट सुविधांसाठी ६०% हमी कव्हर प्रदान करेल. ही योजना पात्र एमएसएमईंना देण्यात येणाऱ्या १०० …
Read More »आदिती तटकरे यांचे आवाहन, राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कामास गती द्या महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या …
Read More »कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना जामीन अंदुरेसह पाच आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या सहा आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केल्याचे न्यायालयाने जामीन देताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठाने सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे आणि वासुदेव …
Read More »मुंबई महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण होणार उच्च न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन
भांडुपमधील महापालिका रुग्णालयात अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करून गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या तीस प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यासाठी उच्च न्यायालयाने आठ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. महानगरपालिका रुग्णालयातील वाईट, बिकट परीस्थितीची माहिती …
Read More »नितेश राणे यांची मागणी, परिक्षेच्या कालावधीत बुरखा बंदी घाला भाजपाचे मंत्री नितेश राणे यांची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी
राज्यात पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली. पुढे आपल्या पत्रात मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या बुरख्यावर आक्षेप घेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी …
Read More »मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती पर्यटन धोरण २०२४ मध्ये अटी आणि शर्ती देखील शिथिल केल्या
महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ अंतर्गत, राज्यातील मेगा आणि अल्ट्रा मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी, अतिरिक्त सवलती आणि प्रोत्साहने देण्यासाठी आणि पर्यटन धोरण २०२४ मध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्ती शिथिल करण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली. आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभागाचे …
Read More »दिल्ली दौऱ्यावरील धनंजय मुंडे भेटले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनाः अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करा सर्व्हरच्या समस्या, E Pos मशीन यांसह विविध अडचणींच्या अनुषंगाने जोशी - मुंडेंमध्ये सकारात्मक चर्चा
महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप NFSA अधिनियम – २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला २०२१ साली प्रस्ताव …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, ‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, निती आयोगानेच सांगितलंय आर्थिक आणि सामाजिक स्थितीत घसरण निती आयोगाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झाल्याचे निती आयोगाने सांगितलंय, हे अतिशय गंभीर आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालाची जबाबदारी राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, श्वेतपत्रिका काढून यावर …
Read More »
Marathi e-Batmya