Editor

विस्डम हॅचच्या संस्थापकाचा सल्ला, कर कपात करा, नोकरभरती कमी करा आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिला अर्थमंत्री सीतारामण यांना सल्ला

विस्डम हॅचचे संस्थापक अक्षत श्रीवास्तव यांनी आगामी २०२५ च्या अर्थसंकल्पासाठी सहा कृतीयोग्य रणनीती प्रस्तावित केल्या आहेत. पुरवठा वाढवणे, अकार्यक्षमता कमी करणे आणि विकासाला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करून, त्यांच्या शिफारशी देशाच्या आर्थिक परिदृश्यातील काही महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्याचे उद्दिष्ट ठेवतात. श्रीवास्तव यांच्या मते, पहिले पाऊल म्हणजे पुरवठ्याच्या बाजूच्या अडचणी …

Read More »

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ६.५ मिलियम मुले धोक्यात गंभीर आजारावरील औषधांचे संशोधन थांबण्याची शक्यता

अमेरिकन सर्जन आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. अतुल गावंडे यांनी ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या “स्टॉप वर्क ऑर्डर” ची टीका केली आहे, जागतिक आरोग्यावर गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. “ट्रम्पच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या स्टॉप वर्क ऑर्डरमुळे जगाचे आणि अमेरिकेचे गंभीर नुकसान होते,” असे गावंडे यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी …

Read More »

मोहन भागवत भिवंडीत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म म्हणजे काय…. तिरंगा या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र

मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, आपला …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा निर्धार, दडपशाहीला थारा देणार नाही… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना …

Read More »

अपात्र ठरणाऱ्या लाडकी बहिणीच्याबाबत सरकारकडून जारी केला हा आदेश लाडकी बहीण लाभार्थीकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही

नुकतेच राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या पात्रतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक लाभार्थी महिलेने तीचे आधार कार्ड बँक खात्याशी संगलग्नित करावे असे सांगितले होते. तर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियमानुसार एकाच योजनेच्या लाभ महिलांना घेता येईल असे जाहिर वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील लाडकी बहिण योजनेतील …

Read More »

१९५० च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे झालेले बदल तुम्हाला माहित आहेत का? नवी पदके, संगीत आणि संरक्षण आणि नागरिकांसाठीची खास पदके

२६ जानेवारी १९५० रोजी, भारत एक प्रजासत्ताक बनला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेशातून एका सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला. नवीन प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि त्यापैकी प्रमुख बदल संरक्षण सेवांशी संबंधित होते, नवीन पदके स्थापित करण्यात आली आणि वसाहतवादी पदकांच्या जागी नवीन पदके तयार करण्यात आली. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर …

Read More »

प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याची झलक कर्तव्य पथवरः विविध राज्यांच्या रथांनी मने जिंकली कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …

Read More »

७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे जिल्हा अग्रेसर…. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रात सुधारणा

आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले …

Read More »

मुंबई समुद्र किनारी रस्त्याची उत्तर वाहिनीचे लोकार्पणः काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टै सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत, किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »