एखाद्या जमीन मालकाला मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील अशोक आणि अतुल पुराणिक या दोन भावांच्या भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनीची उर्वरित नुकसान भरपाईही सहा आठवड्यांत देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. मालमत्तेचा अधिकार घटनात्मक अधिकार आहे. परंतु, एका कुटुंबातील मालमत्तेच्या …
Read More »परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल म्हणाले, अदानी प्रकरणी माहिती दिली नव्हती अमेरिकेने जारी केलेल्या अटक वॉरंटप्रश्नी पहिल्यांदाच सरकारची भूमिका
अदानी समूहाच्या तपासाबाबत भारताला युनायटेड स्टेट्स सरकारकडून माहिती देण्यात आली नव्हती, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (२९ नोव्हेंबर २०२४) सांगितले, ज्यांनी पुष्टी केली की वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाला अद्याप यासंबंधी कोणतेही कायदेशीर कागदपत्र मिळालेले नाही. भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या अदानी अधिकाऱ्यांवर आरोप. याला “खाजगी कंपन्या आणि व्यक्ती आणि …
Read More »इंडिगोच्या कर्मचाऱ्याच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द इंडिगो एअरलाइन्सच्या सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्धचा दाखल होता गुन्हा
महिला प्रवाशाच्या हातातील पिशवी हिसकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध दाखल गुन्हा उच्च न्यायालय़ाने नुकताच रद्द केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मत व्यक्त करताना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार, कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचा संबंधित व्यक्तीचा (पुरुष) हेतू असणे आवश्यक आहे. या प्रकरणात …
Read More »देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी घसरला जुलै ते सप्टेंबर अखेर निचांकी ५.४ वर पर्यंत खाली आला
भारताचा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढ जुलै-सप्टेंबरमध्ये सात-तिमाहीतील नीचांकी ५.४ टक्क्यांपर्यंत घसरली, जी ६.५ टक्क्यांच्या सर्वसंमतीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन आणि खाणकामातील “मंद वाढ”, सरकारी खर्चाची सतत गती आणि कमकुवत खाजगी वापराचा आर्थिक विकासावर तोल गेला. देशाचा जीडीपी वाढ …
Read More »जलदगतीने खटला चालवणे हा आरोपीचा अधिकार असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण : खटला संथगतीने सुरू असल्याच्या कारणांती आरोपीला जामीन
खटला जलदगतीने चालवणे हा आरोपीचा अधिकार आहे. याप्रकरणी खटला जलदगतीने चालवण्याचे विविध न्यायालयांकडून आदेश देऊनही खटल्याच्या सुनावणीत फारशी प्रगती झाली नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आणि व्यावसायिक वादातून वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्जदाराला न्यायालयाने जामीन मंजूर केला. जलदगतीने खटला चालवला जाणे हा आरोपीचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याविरोधातील खटला जलगतीने …
Read More »आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे
अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला दिलेला निधी देवेंद्र फडणवीसांकडून अखेर रद्द राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेला निधी चुकीचा म्हणून अखेर रद्द
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विविध समाजघटकांना खुष करण्याचा सपाटाचा लावला होता. त्यावेळी शेवटच्या दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला १० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच वक्फ बोर्डाशी संबधित एका …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट दरे गावात व्हाया मुंबई मंत्रिपद वाटपाची बैठक पुढे ढकलली
विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात नाराजी नाट्य सुरु झाले आहे. त्यातच काल रात्री नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचे नाव अंतिम करण्यात न आल्याने काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत असून नवी …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत जिल्हाधिकाऱ्यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता …
Read More »नाना पटोले यांची मागणी, वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या …
Read More »
Marathi e-Batmya