आरोग्य, पोषण आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रोकोलीसाठी समर्पित पहिल्यांदाच भव्य परिषद मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. “ब्रोकोली लागवडीपासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत” या थीमवर ही परिषद १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होईल, त्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील …
Read More »काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाची दखल, मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस मुख्यमंत्री फडणवीसांच्या आचारसंहिता भंगाबाबत काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, वांद्र्यातील एमएसआरडीसीची २४ एकर जमीन अदानीच्या घशात तर MSRDC चे ऑफिस दादरला २ कोटी रुपये भाड्याच्या जागेत
देवेंद्र फडणवीस सरकार दिल्लीच्या आदेशाने मुंबईतील मौल्यवान व अत्यंत महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालत आहे. विमानतळ, धारावी, देवनार डंपिंग ग्राऊंड, मोतीलाल नगर, एअर इंडिया वसाहत, मदर डेअरीची जमीन व मिठागरांची जमीन दिल्यानंतर आता वांद्रे रिक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची २४ एकर जमीनही अदानीला बेकायदेशीरपणे दिली आहे. अदानीला आतापर्यंत मुंबईतील ३ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर
राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बदल्या-पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकनानुसार कार्यवाही करा आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश
सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही …
Read More »ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आय-पीएसी कोळसा घोटाळा प्रकरणातील त्यांच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय एजन्सी ईडीने त्यांच्या याचिकेत या घटनेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी करत, असा …
Read More »आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निकोप, पारदर्शक व भयमुक्त निवडणुकांना राज्यात हरताळ पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? किती परत पाठवले ? केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माहिती उपलब्ध नाही, आरटीआयमधून माहिती पुढे
भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित साटम यांनी हिंदु मुस्लीम वाद उकरून काढला. मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? परत पाठवले ? हा प्रश्नाचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकारात …
Read More »हॉवर्ड ल्युटनिक यांची स्पष्टोक्ती, मोदींनी फोन केला नाही म्हणून अमेरिका-भारत करार रखडला टॅरिफ वाढीनंतर अमेरिका-भारता दरम्यानचा करार रखडला
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी केलेल्या दाव्याला भारताने शुक्रवारी ‘अचूक नाही’ असे म्हणत फेटाळून लावले. ल्युटनिक यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संवाद साधला नाही, म्हणूनच भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही. हॉवर्ड ल्युटनिक यांच्या दाव्यावरून असे दिसून येते की, भारताप्रती …
Read More »
Marathi e-Batmya