Editor

आयटीआय मुंबईचे नामकरण, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा शुभारंभ कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद-राज्यमंत्री जयंत चौधरी

महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल

राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …

Read More »

अक्षय शिंदे एनकाऊंटर: न्यायालयाचे आदेश, १८ नोंव्हेबर पर्यंत चौकशी अहवाल सादर करा उच्च न्यायालयाचा अहवाल- वाहनाची फॉरेन्सिक तपासणी केली का

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरची दंडाधिकाऱ्यामार्फत जलद चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिले. तसेच त्यासंदर्भातील अहवाल १८ नोव्हेंबर रोजी पर्यंत सादर कऱम्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती-मोहिते-डेरे आणि न्यायाधीश पी के चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पोलिसांना आज दिले. न्यायालयाने पुढे …

Read More »

तुरुंगातील कैद्यांना जातीनुसार वागणूक, सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, तर्क स्विकारार्ह नाही मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द

प्रचलित जात-आधारित पृथक्करण असंवैधानिक घोषित करणाऱ्या महत्त्वपूर्ण निकालात, सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत जातीवर आधारित तुरुंगातील कैद्यांना वागणूक ही चुकीचे असून तसा तर्क स्विकारणे हे अमेरिकेतील वंशाधिरीत तर्काकडे नेणारा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करत मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरविला. यासंदर्भात द वायरच्या पत्रकार सुकन्या शांता …

Read More »

शेतकऱ्यांनो, आंबिया बहार फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्या डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरीच्या फळबागांना मिळणार सुरक्षा विमा कवच

पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकासाठी ३० जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. या योजनेत कर्जदार तसेच बिगर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, ‘शक्ती अभियानात सहभागी व्हा राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न

राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. महिलांच्या बाबतीत ‘आधी आबादी, पुरा हक’ हा काँग्रेसचा नारा असून राजकारणात आणि शासनाच्या सर्व स्तरांवर ‘महिला प्रतिनिधित्व’ वाढावे यासाठी काँग्रेस पक्षाने आता …

Read More »

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा, दसऱ्याला सौ सोनार की एक लोहार… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मशालचे नवे गाणं रिलीज

नवरात्री सणाच्या निमित्ताने आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती नवे थीम साँग आज जारी केले. हे थीम साँग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. दादर येथील शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा ईशा फांऊडेशनवरील कारवाईस मज्जाव पोलिस लष्कराला अशा संस्थेत प्रवेश देऊ शकत नाही

सदगुरू जग्गी यांच्या ईशा फाऊंडेशनच्या विरोधातील तक्रारीप्रकरणी सध्या मद्रास उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले की, तुम्ही लष्कर किंवा पोलिसांना अशा संस्थेत येऊ देऊ शकत नाही असे मत व्यक्त करत तामीळनाडू पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला एकप्रकारे मज्जाव केला …

Read More »

देशात चार वर्षातील सर्वाधिक पाऊसः शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी फायदेशीर २०२० नंतर ९३४.८ टक्के पाऊस

या हंगामात मान्सूनच्या पावसात लक्षणीय वाढ अनुभवली आहे, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८% अधिक पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार देशात ९३४.८ मिमी पाऊस पडला आहे आणि दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८% आहे. या हंगामात २०२० नंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे आणि कृषी क्षेत्रासाठी आशादायक दृष्टीकोन सुनिश्चित केला आहे. आयएमडी …

Read More »

मध्य पुर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्याने वाढ इराण-इस्त्रायल आणि इस्त्रायल-लेबनॉन संघर्ष

मध्य पुर्वेतील इराणचा मंगळवारी इस्रायलविरुद्धचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी आघात आणि उत्तरार्धाच्या धमकीमुळे पश्चिम आशियातील तणाव वाढू शकतो या चिंतेने बुधवारी तेलाच्या किमती ३% पेक्षा जास्त वाढल्या, ज्यामुळे या प्रदेशातील क्रूड उत्पादनात अडचणी येऊ शकतात. ब्रेंट फ्युचर्सने एका महिन्यातील उच्चांक गाठला, $२.४२, किंवा ३.३%, $७५.९८ प्रति बॅरल. इराणने बुधवारी पहाटे …

Read More »