Breaking News

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन निवडणूक निधीचे व्यवस्थापन

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यामध्ये नुकताच करार करण्यात आला. निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी …

Read More »

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका असून या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या …

Read More »

अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात, जलदगती सुनावणीसाठी सरन्यायाधीश सकारात्मक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने काल ईडीच्याच्या बाजूने निकाल देत अरविंद केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे ठरविले. त्यानंतर आज लगेच अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई …

Read More »

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंचा ‘ऊन सावली’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचा माफीनामा स्विकारण्यास दिला स्पष्टपणे नकार

पतंजलीचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंघोषित योगगुरूला मनाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदचे स्वंयघोषित योगगुरु रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, वंचितच्या नादी लागू नका कपडे फाडण्यात एक्सपर्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजपा जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटू लागले असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »

अखेर राष्ट्रवादीकडून सातारा आणि रावेरच्या उमेदवारांची नावे जाहिर

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील दोन महिन्यापासून सुरु झालेल्या चर्चेवर काल शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून फक्त पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचीच नावे जाहिर केली होती. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले आले आहे. …

Read More »

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर …

Read More »