Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, कामे वेळेत करा पण कमीत कमी झाडे तोडा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला विविध कामांचा आढावा

मुंबई शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यामध्ये वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था …

Read More »

अखेर राज ठाकरेंच्याच “त्या” व्यंगचित्रातून शिवसेनेने दिले मनसेला प्रत्युत्तर सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदूत्व

राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत अल्टीमेटम दिला. तसेच राज्यातील हिंदूत्वाच्या मुद्यावरूनही आक्रमक भूमिका स्विकारण्यास सुरुवात केली. तसेच नुकताच अयोध्या दौराही राज ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र याच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केलेली पुन्हा शिवसेनेने सव्याज परत करत त्यांचेच एक …

Read More »

भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …

Read More »

सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही हे डोक्यात ठेवून कामाला लागा आज महागाई इतकी वाढलीय याबाबत लोकांना सांगा...केंद्र सरकारची पोलखोल करा - जयंत पाटील

प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला… आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा… या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा असे आवाहन राष्ट्रवादी …

Read More »

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षणासंबधी केंद्राचे राज्याला पत्रः बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरा आता खुल्या वर्गाबरोबर आरक्षित प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाविषयीच्या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे जरी फक्त खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सध्या पदोन्नती मिळत असली तरी आता आरक्षित वर्गातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभावित अधीन राहुन पदोन्नती देण्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदोन्नतीतील …

Read More »

अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करायचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची आघाडी सरकारवर टीका

समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली हे देवेंद्र फडणवीसच सांगतील राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला- नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस …

Read More »

“दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण तर अजित पवारांकडून आदित्यचे कौतुक मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा

गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते. …

Read More »

अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला

पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …

Read More »