Breaking News

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाबद्दल टोपे यांनी राजीनामा द्यावा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. भांडारी यांनी पत्रकात म्हटले …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ: परिक्षार्थींनी व्यक्त केला संताप आरोग्य मंत्री म्हणतात तांत्रिक अडचण आली असेल

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सुरु असलेली गोंधळाची परिस्थिती परिक्षेच्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे अनेक परिक्षार्थींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेक परिक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारला या त्रासाचे कारणीभूत ठरविले. भरती प्रक्रियेसाठी न्याया कम्युनिकेशनला काम दिल्यापासून अर्ज भरलेल्या …

Read More »

गौप्यस्फोटानंतर ३ वेळा पत्रकार परिषद रद्द करून एनसीबीचे अखेर पत्रक जाहिर सैलने केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळले

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान अंमली पदार्थ केसमधील एक पंच आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेला के.पी.गोसावी याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर सैल यांने आज एका व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे या प्रकरणी गौप्यस्फोट करत अनेक आरोप केले. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीची संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली. या गौप्यस्फोटानंतर जवळपास एनसीबीने …

Read More »

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर सैलचा गौप्यस्फोट: शाहरूखकडे मागितली खंडणी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्राद्वारे केला गौप्यस्फोट-जीवाला धोका असल्याने दिली कबुली

मुंबई : प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्जप्रकरणात आणखी एका नव्या ट्विस्टची आज भर पडली असून या प्रकरणातील पंच के.पी.गोसावी याचा बॉ़डीगार्ड आणि १८ व्या नंबरचा पंच प्रभाकर सैल यांने आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रूपये मागितले गेले पण १८ कोटीवर ही डील फायनल झाल्याचे सांगत त्यातील …

Read More »

भाजपा भक्कम असल्यानेच शरद पवारांसह अनेकजण विजयासाठी मैदानात सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा : मनसेबरोबर युती नाहीच-चंद्रकांत पाटील

पिंपरी: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री …

Read More »

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी इच्छुक पात्र शेतकाऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत …

Read More »

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी अनेक प्राध्यापकांच्या संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर दिवाळीपूर्वीच महाविकास आघाडी सरकारने तासिका तत्वावरील प्राध्यापकांची ही मागणी मान्य करत त्यांचे तोंड गोड केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मान्य करत तासिका तत्वावर …

Read More »

सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, न्यायालयांनी सर्वसामान्यांना न्यायाची हमी द्यावी गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक

औरंगाबाद : प्रतिनिधी देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा देऊन यंत्रणेचे बळकटीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  एन.व्ही.रमणा यांनी आज येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या बी आणि सी विंगचे आज उद्घाटन …

Read More »

गुंतवणुकीसह कर बचतही हवीय? पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ८० सी खाली करात सवलतही मिळू शकते

मुंबई: प्रतिनिधी पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. पोस्टल सेवेसह पोस्ट अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना चांगला परतावा देणाऱ्या आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी …

Read More »

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? अतुल लोंढे

मुंबई: प्रतिनिधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? …

Read More »