मुंबई: प्रतिनिधी कोरोना आणि लाँगडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी उलट फी मध्ये कमीतकमी १० टक्के सूट द्यावी, अशी विनंती आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना केली. …
Read More »कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती
अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …
Read More »चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला इरफान खान यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहीली श्रद्धांजली
मुंबई:प्रतिनिधी अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक …
Read More »मुंबई की पत्रिका मे मियाँ का नाम है… सुप्रसिध्द अभिनेता इरफान खान यांचे निधन
मुंबई: प्रतिनिधी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे सुप्रसिध्द अभिनेते इरफान खान यांचे रात्री निधन झाले. गेले काही महिने ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अखेर कोकिलाबेन रूग्णालयात त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार …
Read More »९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …
Read More »कुडाळ तहसीलदारांचे ते पत्र अखेर रद्द माहिती जमा करण्याच्या उद्देशासाठी आदेश होता
मुंबई: प्रतिनिधी ३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याच्या उद्देशाने कुडाळमधून बाहेर परराज्यात, परदेशात आणि आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती जमा करण्यासाठी ते आदेश जारी करण्यात आले. मात्र ते कार्यालयीन कामकाजासाठी असलेले पत्र बाहेर आल्याने सदरचे ते पत्र रद्द करण्यात आल्याचा कुडाळच्या …
Read More »सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …
Read More »सोशल मिडीया नियमांचा भंग? केंद्रीय मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक पंतप्रधानांना पत्र लिहीत पेड ट्रोलिंग चालवित जात असल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मिडियावर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येते. मात्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सोशल मिडीयाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत सरकार आणि …
Read More »सरकारकडून देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा अॅड. यशोमती ठाकूर वेळोवेळी घेत आहेत आढावा
मुंबई: प्रतिनिधी देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत या महिलांच्या उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व …
Read More »कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …
Read More »
Marathi e-Batmya