Breaking News

४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे. संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी …

Read More »

कोरोना पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पंतप्रधानांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के म्हणजे तब्बल २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा …

Read More »

मराठी तरूणांसाठी कोरोनाकाळातील उद्योग क्षेत्रात नव्या संधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जावू, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया …

Read More »

पॅकेज-५: राज्यांना यापूर्वीच काहीस दिलयं: ओव्हर ड्राफ्ट देण्याची रिझर्व्ह बँकेला विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशावर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक प्रश्नांनी आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केलीय. तत्पूर्वीच राज्यांना जीएसटी वसूली पोटी द्यावयाची रक्कम एप्रिल महिन्यातच दिली आहे. तर आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून ४ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याचे सांगत आलेल्या …

Read More »

राज्यातला ४ था लॉकडाऊन पोलिसांच्या नव्हे तर पॅरामिलिटरी फोर्सेसच्या बंदोबस्तात जम्मू व काश्मीरमधील १० युनिटसह १८ पथके तैनात होणार

मुंबई:प्रतिनिधी राज्यात संभावित कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी अर्थात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली. मात्र राज्यात सलग ३ वेळा लॉकडाऊन वाढविण्यात येवूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु आता लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी …

Read More »

राज्यात कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत विक्रमी नोंद : ३० हजाराचा टप्पा पार १८४२ रूग्णांचे निदान, ७ हजाराहून अधिक रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १६०६+३६=१८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे. मागील …

Read More »

कोविड आणि मी…. आजारातून बरे झालेले मंत्रालयातील अधिकारी सांगतायत आपबीती खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी

मेरा मुझमे कुछ नही, जो कुछ है ये तेरा । तेरा तुझको सौप दे, क्या लागे है मेरा ।। …संत कबीर साधारण: जानेवारी महिन्यामध्ये माझ्या मित्रांसोबत एका डिनरवेळी कोविड संदर्भाने चर्चा झाली होती. त्यावेळी चीनच्या वुहान प्रांतात या रोगाने पूर्ण धुमाकुळ घातला होता. कालौघात त्याने अमेरिका, युरोप सारख्या वैद्यकिय प्रगत …

Read More »

सोलापूरात रात्रीतील १७ सह दिवसभरात २१ जणांचे निदान संख्या ३६४ वर १५० जण बरे होवून घरी

सोलापूर: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून दररोज किमान १० कोरोननाबाधीत आढळून येत आहेत. काल दिवसभरात अवघे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर रात्रीत १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ रूग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंबरकर यांनी दिली. सद्यपरिस्थित कोरोनाग्रस्तांची संख्या ३६४ वर पोहोचली …

Read More »

पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी? मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी …

Read More »

राज्याची जीवन वाहीनी ठरलेली लाल परी बनली मजुरांची मदत वाहीनी ११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या …

Read More »