Breaking News

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदारांकरिता ३९ हजार ९२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात १५ हजार ९०८ उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आदेश जुनाच

महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे. जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह …

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मक रीत्या त्याचा वापर केला जाईल, …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या फडणवीसांच्या कूनितीची फळं.. भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक …

Read More »

इराण सोडा, सरकारचे भारतीयांना आवाहन, प्रवासाची कागदपत्रे तयार ठेवा वाढत्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे आवाहन

इराणमधील निदर्शनांमधील मृतांचा आकडा २५०० च्या पुढे गेल्याने, इराणमधील भारतीय दूतावासाने सर्व नागरिकांना – ज्यात विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटकांचा समावेश आहे – व्यावसायिक विमानांसह उपलब्ध साधनांचा वापर करून देश सोडण्याचे आवाहन केले आहे. देशातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, आणि अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये कोणतीही नरमाईची चिन्हे दिसत …

Read More »

प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन ओबीसी विभागाकडून विद्यार्थ्यांना आवाहन

प्री-मॅट्रिक (इ. ९ वी व १० वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. ११ वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक …

Read More »

आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा, बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणच्या या गोष्टी तपासणार २९ पैकी अनेक महापालिकांमधील प्रभागांमधील अनेक उमेदवार बिनविरोध पद्धतीत विजयी

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. मतदानाला अवकाश असला तरी मुंबईसह अनेक महापालिकांमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मतदान होण्याआधीच बिनविरोध म्हणून निवडूण आले आहेत. तसेच या उमेदवारांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर ६० पेक्षा जास्त उमेदवारांची संख्या आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली असतानाच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त …

Read More »

गिग कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकिटने टॅगलाईन वापरणे बंद केले १० मिनिटात डिलिव्हरी टॅग ब्रँडिंग लाईन जाहिरातीतून गायब

सरकारी हस्तक्षेप आणि गिग कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल वाढत्या चिंतांमुळे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटने त्यांचे १०-मिनिटांचे डिलिव्हरी ब्रँडिंग बंद केले आहे. मंगळवारी दुपारी, वापरकर्त्यांनी अॅप उघडले तेव्हा ब्रँडिंग आता दिसत नव्हते, जे कंपनीच्या संदेशात शांत बदलाचे संकेत देते. डिसेंबरच्या अखेरीस प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कामगारांनी संप केल्यानंतर काही आठवड्यांनी हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे …

Read More »

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची माहिती, ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानला युद्धबंदी करण्यास भाग पाडले पत्रकार परिषदेत दिली माहिती

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी दोन महत्त्वाच्या वळणांवर प्रकाश टाकला ज्यामुळे गेल्या वर्षी १० मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोठे नुकसान सहन करणाऱ्या पाकिस्तानला भारतासोबत युद्धबंदी करण्यास भाग पाडले. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी खुलासा केला की भारत-पाकिस्तान संघर्ष वाढल्यास कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी सशस्त्र दलांना …

Read More »