Breaking News

अजित पवार यांचे आश्वासन, विशाळगड अतिक्रमणाबाबत… अन्याय नाही राज्यामध्ये दुषित वातावरण निर्माण होईल अशाप्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये

किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अजित पवार पुढे म्हणाले की, अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या …

Read More »

चंदिगड दिब्रुगड एक्सप्रेसचे डबे रूळावरून घसरलेः चार जण मृत तर ३० जण जखमी उत्तर प्रदेशात गोंडा जवळ घडला अपघात

मागील काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. आसाम आणि दार्जिलिंग जवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटना अद्याप ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ आज चंदिगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात किमान चार प्रवासी ठार तर ३० हून अधिक प्रवाशी जखमी झाले, असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले. …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी तो संदर्भ देत म्हणाले, लाडका भाऊ अशी योजनाच नाही मुख्यमंत्री शिंदे यांची जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पोलखोल

लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच गॅरंटी जाहिर केली होती. या पाच गॅरंटी मध्ये देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बेरोजगार तरूणांसाठी बेरोजगार भत्ता तर महिलांसाठी दरमहा ८५०० रूपये देणार असल्याची घोषणा केली होती. नेमक्या याच घोषणांच्या धर्तीवर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही दिवस आधी …

Read More »

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे. यामध्ये दहा वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शासकिय केंद्रावर भरले जाणारे अर्जच ग्राह्य पैसे मागणाऱ्याला तुरुंगात पाठवा

नुकतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहिर केल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी लाडका भाऊ योजना जाहिर केली. तसेच महिलांप्रमाणे राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महिना ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रूपयांचे मासिक भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी काही राज्य सरकारी …

Read More »

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी धनंजय मुंडे तर प्रदेश प्रवक्ते राजेश विटेकर यांची नियुक्ती २२ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अजित पवार दौऱ्यावर-सुनिल तटकरे यांची माहिती

सोमवारी २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजित पवार …

Read More »

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत जिल्हाधिकाऱ्यांची बदली तर जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका करत या दुर्देवी घटनेचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, NEET-UG चे परिक्षा केंद्रनिहाय गुण जाहिर करा शनिवारी दुपारपर्यंत संकेतस्थळावर परिक्षा केंद्र निहाय गुण जाहिर कऱण्याची मुदत

NEET-UG परिक्षा पेपर लिक प्रकरणी संपूर्ण परिक्षा रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अशा विविध अशा ३८ याचिकांवरील एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात येत आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला NEET-UG 2024 मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय विद्यार्थ्यांची ओळख जाहिर …

Read More »