Breaking News

ठाणे खाडी परिसरात आढळली गरुडासारखी दिसणारी ब्राह्मणी घार दक्षीण भारतातून शेकडो मैलाचा प्रवास करत भक्ष्य शोधण्यासाठी घरीच्या घिरट्या

ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना बघण्याची नजाकत काही वेगळी असताना, गरुडासारखी चालाख आणि घारीसारखा दिसणाऱ्या ब्राम्हणी घार (Brahminy Kite ) पक्षीप्रमींचे लक्ष वेधत आहे. समुद्र-खाडीतील माश्यांबरोबर नदी तलावातील माश्यांचा फडशा पाडण्यासाठी ब्राम्हणी घार दक्षिण भारतातून येत असून सावजाला (माशाला) पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना बघण्याची वेगळी संधी ठाणेकराना मिळत आहे. हिवाळ्यात ठाणे खाडीच्या …

Read More »

आशियाई विकास बँकेकडून भारताच्या जीडीपीबाबत आशादायक चित्र ७ टक्के जीडीपी दर राहण्याचा अंदाज

कृषी क्षेत्रातील संभाव्य पुनरावृत्तीमुळे समर्थित उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीचा आधार घेत आशियाई विकास बँकेने (ADB) बुधवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारताचा जीडीपी GDP अंदाज ७ टक्क्यांवर कायम ठेवला. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ७ टक्के अंदाजाप्रमाणे आहे, परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ७.२ टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. “भारताचे औद्योगिक क्षेत्र उत्पादन आणि …

Read More »

प्रधान मंत्री फसल विमान योजनेत आणखी काही राज्य सहभागी होणार बिहार, नागालँडसह अनेक राज्यांकडून विचार सुरु

बिहार आणि नागालँडसह अनेक राज्यांनी प्रधान मंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) सामील होण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे, ज्यामुळे उच्च अनुदानित पीक विमा योजनेचे कव्हरेज आणखी वाढेल. सूत्रांनी सांगितले की झारखंड आणि तेलंगणाने यापूर्वी या योजनेत सामील होण्याचा निर्णय घेतला होता, तर बिहार, ज्यांनी यापूर्वी ‘प्रिमियम सबसिडीची ऐतिहासिक …

Read More »

अदानी प्रकल्पाच्या चिनी तंत्रज्ञांसाठी भारताकडून व्हिसा कालवधी कमी करणार? अदानीच्या प्रकल्पासाठी चिनी तंत्रज्ञांसाठी नियमात बदल करण्याचा घाट

एनडीए NDA सरकार अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या उत्पादन युनिट्सच्या विलंबाची भरपाई करण्यासाठी चिनी तंत्रज्ञांसाठी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे व्हिसासाठी ४ ते ५ महिन्याचा लागणारा कालावधी कमी करून एका महिन्याच्या कालावधीवर आणण्याचा विचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की …

Read More »

एअर इंडिया आणि विस्तारा विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर टाटाने आणली व्हिआरएस योजना कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना

टाटा समूह-नियंत्रित एअर इंडिया विस्तारासोबत विलीन होण्यापूर्वी आणखी कर्मचारी कमी करणार आहे. बुधवारी, वाहकाने आपल्या कायमस्वरूपी ग्राउंड स्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) जाहीर केली. ग्राउंड कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात, एअर इंडियाने म्हटले, “आम्ही एअर इंडियामध्ये किमान पाच वर्षे सतत सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) आणि त्यापेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक …

Read More »

राज ठाकरे यांच्या पोस्टवर शरद पवार यांची खोचक टीका, महिना-दोन महिन्यानंतर जागे… आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जातीपातीबाबत केली होती पोस्ट

राज्यातील वारकरी संप्रदायांच्या आषाढी एकादशी निमित्त राज्यातील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांकडून आषाढी वारीचे निमित्त साधत राज्यातील अनेक प्रश्नी विठ्ठलाला साकडे घातले. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशी निमित्त साधत महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा मनसे प्रमुख राज …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, SC यादीत राज्य सरकारला छेडछाड करता येणार नाही बिहार सरकारच्या निर्णयावर न्यायालयाचा निर्णय

राज्यघटनेच्या कलम ३४१ अन्वये अधिसूचित केलेल्या शेड्युल कास्ट अर्थात अनुसूचित जातींच्या यादीत राज्ये छेडछाड करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विक्रम यांच्या खंडपीठाने “कोणत्याही जाती, वंश किंवा जमातीचा किंवा जाती, वंश किंवा जमातींमधील कोणत्याही गटाचा किंवा गटाचा समावेश करणे किंवा वगळणे हे संसदेने बनवलेल्या कायद्याने केले पाहिजे …

Read More »

दिव्यांगांच्या उपक्रम अनुदानासंबंधी सरकारचे धोरण जाहीर बिगर अनुदानित दिव्यांग शाळा-वसतीगृहांना मिळणार अनुदान

राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतीगृहे, कार्यशाळा (प्रशिक्षण केंद्र), आणि अनाथ मतिमंद यांची बालगृहे ही कायमस्वरूपी विनाअनुदान /विना अनुदान तत्त्वावर चालवली जातात. त्यांच्या अनुदानाबाबत प्रचलित असलेले शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत. तसेच दिव्यांगांच्या उपक्रमांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी पुरेशा नाहीत. ही बाब लक्षात घेता शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सर्व …

Read More »

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) संस्था कंपनी नोंदणी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ नुसार स्थापन करण्यास मान्यता …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात …

Read More »