मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित …
Read More »अ.नगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत: आठवड्यात चौकशी अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावलेल्या रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याकडे रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याचे आदेश देत आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची आर्थिक मदत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »अहमदनगर मधील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक
अहमदनगर-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर …
Read More »राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य
मुंबई : प्रतिनिधी विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाची साथ …
Read More »आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ: परिक्षार्थींनी व्यक्त केला संताप आरोग्य मंत्री म्हणतात तांत्रिक अडचण आली असेल
मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सुरु असलेली गोंधळाची परिस्थिती परिक्षेच्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे अनेक परिक्षार्थींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेक परिक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारला या त्रासाचे कारणीभूत ठरविले. भरती प्रक्रियेसाठी न्याया कम्युनिकेशनला काम दिल्यापासून अर्ज भरलेल्या …
Read More »वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ …
Read More »या उपसंचालकांच्या निरीक्षणाखाली होणार आरोग्य विभागाची लेखी परीक्षा उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती-संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी …
Read More »आरोग्य विभागाच्या परिक्षा गोंधळावर संचालकांचा खुलासा विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील
मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या परिक्षेतील गोंधळ काही केल्या कमी होण्यास तयार नसून अनेक परिक्षास्तुक उमेदवारांना त्यांनी मागितलेल्या परिक्षा केंद्रापेक्षा वेगळेच केंद्रे मिळाले असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी यावर खुलासा करत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र …
Read More »कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय …
Read More »आजपासून मिशन कवच कुंडल अभियान : दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. …
Read More »
Marathi e-Batmya