राजकारण

निवडणूकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ७ वा वेतन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत सरकारी कर्मचाऱ्यांना पाठोपाठ महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायतीतील तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांनाही ७ वेतन आयोग देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१९ पासून लागू होणार असल्याचे राज्य सरकारच्यावतीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विशेष म्हणजे विधानसभा …

Read More »

वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच मंगळवेढा येथील जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री …

Read More »

कॉ.पानसरे तपासप्रकरणात मुख्यमंत्र्यांवर ताशेरे नाहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी दाभोळकर-पानसरे यांच्या हत्येची चौकशी सीबीआय आणि सीआयडीकडून सुरु असून याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉ.पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणतेही भाष्य केले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कॉ.पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील तपासप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत …

Read More »

सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. …

Read More »

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …

Read More »

अर्थसंकल्प फुटीची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर …

Read More »

अखेर नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात ४० गावांच्या ग्रामस्थांची पसंती

मुंबईः प्रतिनिधी बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावातील जमिन अधिग्रहण करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुख्यमंत्र्याना पाहताच विरोधक म्हणतात आले रे आले चोरटे आले विधासभेत आणि पायऱ्यावर विरोधक आणि मुख्यमंत्री यांच्यात पहिल्याच दिवशी सामना

मुंबईः प्रतिनिधी आले रे आले चोरटे आले असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहण्यास मिळाला. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. कारण त्यांनी भाजपात प्रवेश केला …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »

मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर …

Read More »