कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …
Read More »उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने
वाशिमः प्रतिनिधी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून शिवसेनेला मिन्नतवाऱ्या करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. …
Read More »निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खोचक टीका
मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून …
Read More »अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …
Read More »१० स्मार्ट सिटी करणार होतात…एकतरी करायची ना… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी दहा स्मार्ट सिटी करणार होता ना… मग एक तरी करायची होती ना… करता येत नाहीतर पडता कशाला त्यामध्ये…अशी खोचक टीका करत भाजप सरकारच्या अनेक फसव्या योजना आणि राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यस्था…मेक इन महाराष्ट्रातील गायब उदयोग…आणि रोजगार…यासह अनेक मुद्दयांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप …
Read More »बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर न्यायालयाच्या आदेशानुसार २ महिन्यात कारवाई शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे, येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करुन दोषी आढळलेल्या संबंधिताविरुध्द कारवाई करुन त्यांच्यावर आवश्यक कलमे लावण्यात येतील. तसेच बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांना पाठीशी घालण्यांविरुध्दही कारवाई करण्यात येईल असे आश्वासन …
Read More »मुस्लिम-धनगर आरक्षणावरून विरोधक आक्रमक आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यातील धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे या मागणीवरून विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही केली. यावेळी समाजवादी पार्टीचे अबु आझमी, एमएमआयएमचे इम्तियाज …
Read More »शिवसेनेला राम पावला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी
मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कदाचित शिवसेनेला खूष करण्यासाठी या उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे दिसून येत असून शिवसेनेला राम पावला असल्याची मिश्किल …
Read More »मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली जाईल. या बैठकीत निर्णय घेवून त्याविषयी राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती करून त्याचा अहवाल करण्यास सांगण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर …
Read More »सीमाप्रश्न कोर्टाबरोबरच बाहेरही सोडवावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी बेळगाव सीमाप्रश्नी नियुक्त उच्चाधिकार समितीची बैठक लवकर बोलवावी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेवून सीमाप्रश्न कोर्टाबरोबरच बाहेरही सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आक्रमक रहावे अशी मागणी विधीमंडळ गटनेते आमदार जयंतराव पाटील यांनी केली. सीमाप्रश्नी नेमण्यात आलेले वकील हरीष साळवे आणि इतर वकीलांशी चर्चा करुन …
Read More »
Marathi e-Batmya