राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, महिलेला न्याय देण्यासाठी एक दोन वेळा फोन मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर केले भाष्य

काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाचे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठविलेल्या अर्धनग्न फोटोवरून राजकिय वाद रंगलेला असतानाच या प्रकरणाला आता ब्लॅकमेलिंगचे वळण मिळाले आहे. त्यातच या प्रकरणी आरोपीचा संबध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात आरोपी अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देना मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर एका महिलेने आरोप करत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणी महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप करत आरोपी महिला, तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना विनंती केली

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे  छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन आणि देखाभाल व दुरूस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी  विनंती करणारे पत्राव्दारे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना केली. आशिष शेलार आपल्या पत्रात म्हणाले की, छत्रपती श‍िवाजी महाराज आण‍ि मराठा साम्राज्याच्या बलाढय …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या  प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेटमध्ये बेटींग आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत बेटींग संदर्भातील पोलिसांच्या संभाषणाचा पेन ड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. …

Read More »

फार्मसी एक्झिट परीक्षा शुल्कबाबतचा विषय राज्य शासन जीएसटी कौन्सिलकडे मांडणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) यांच्या अधिसूचनेद्वारे पदविका धारक विद्यार्थ्यांना राज्य फार्मसी कौन्सिलकडे फार्मासिस्ट म्हणून (परवाना करिता) नोंदणी करण्यापूर्वी डिप्लोमा इन फार्मसी “एक्झिट एक्झामिनेशन” ही परीक्षा देणे आवश्यक केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत असून प्रमाणपत्राकरिता “एक्झिट” परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली …

Read More »

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार …

Read More »

महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुलेंना ‘भारत रत्न’ द्या खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महान विभूतींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरवण्यात यावे, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने पारित केला, त्याचा आनंद आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी २०१५ साली फुले दांपत्याला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता केंद्र सरकारने सर्व …

Read More »

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी ५० टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या  व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२२ पासून सुधारित किमान वेतन …

Read More »

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची विधानसभेची शिफारस विधानसभेत एकमुखी मागणी ठरावः जयकुमार रावल यांनी मांडला ठराव

मागील अनेक वर्षापासून स्त्री शिक्षणाचे उद्गाते आणि पहिली मुलींची शाळा आणि शाळेच्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात यावी अशी मागणी सातत्याने राज्यातील सर्वच स्थरातून करण्यात येत होती. तसेच राज्यातील महायुती सरकारनेही यासंदर्भात राज्यातील जनतेला आश्वासन दिले जात होते. अखेर यासंदर्भात आज …

Read More »