राजकारण

अतुल लोंढे यांचा सवाल, शाळकरी मुलांना अंडी व फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू

भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »

आदिती तटकरे यांचे आवाहन, राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कामास गती द्या महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या …

Read More »

नितेश राणे यांची मागणी, परिक्षेच्या कालावधीत बुरखा बंदी घाला भाजपाचे मंत्री नितेश राणे यांची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

राज्यात पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली. पुढे आपल्या पत्रात मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या बुरख्यावर आक्षेप घेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी …

Read More »

दिल्ली दौऱ्यावरील धनंजय मुंडे भेटले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनाः अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करा सर्व्हरच्या समस्या, E Pos मशीन यांसह विविध अडचणींच्या अनुषंगाने जोशी - मुंडेंमध्ये सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप NFSA अधिनियम – २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला २०२१ साली प्रस्ताव …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निती आयोगानेच सांगितलंय आर्थिक आणि सामाजिक स्थितीत घसरण निती आयोगाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झाल्याचे निती आयोगाने सांगितलंय, हे अतिशय गंभीर आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालाची जबाबदारी राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, श्वेतपत्रिका काढून यावर …

Read More »

जयकुमार गोरे यांच्या सूचना, जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने कोकण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप, व्हिआयपी कल्चरमुळे घटना कुंभमेळ्यात अर्धवट व्यवस्था आणि व्हिआयपी कल्चर

महाकुंभात अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपींनी स्वतःहून केलेले प्रचार यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सभास्थळी व्हीआयपी कल्चरवर बंदी घालण्याची मागणीही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, “महाकुंभमेळ्यादरम्यान तीर्थराज …

Read More »

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विकसित भारत २०४७ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …

Read More »