राजकारण

नाना पटोले यांची मागणी, फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे… कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? मोहन भागवत मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाहीत?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत …

Read More »

महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय, आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. समिती गठीत न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. दहा व त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात समिती गठित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले. दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

कामगार संहितेनुसार नियमावली तयार; विधिमंडळ अधिवेशनात नियमावली मांडणार कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची माहिती

महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली. येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. …

Read More »

वाळू निर्गती धोरण २०२५ चे प्रारुप हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध १५ मार्च पर्यंत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

शासनामार्फत वाळू/ रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण, दि. १६.०२.२०२४ व शेतामधील वाळू निर्गतीबाबतचे धोरण, दि. १५.०३.२०२४ अधिक्रमित करण्यात येऊन त्यामध्ये काही सुधारणा करुन प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ चे प्रारुप हरकती/ सूचनेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ च्या प्रारुपाच्या अनुषंगाने काही …

Read More »

ईडी नोटीसीवर पहिल्यांदा भाष्य करत राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा ईव्हीएम मशिन्सवर व्यक्त केली शंका

काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस आली होती. मात्र आता पर्यंत त्या नोटीसीबाबत राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकवेळा बोलण्याचे टाळले होते. मात्र आज पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पहिल्यांच बोलताना म्हणाले की, मलाही ईडीची नोटीस आली. त्यानंतर मी त्याच्या त्यांच्यासमोर गेलो. बरं ती नोटीस कशाबद्दल …

Read More »

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांची माहिती

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी ४०६६ नव्या आधार किटचे वाटप १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज दिली आशिष शेलार यांनी पुढे बोलताना म्हणाले की, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही कृष्णा आधळे कुठे आहे त्याचा तपास काय

महाराष्ट्रातील हप्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी ताकदीने आम्ही सर्व लढणार असा निर्धार व्यक्त करत सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक सल्ला, फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय द्यावा अजित पवारांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत का? पीकविमा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय?

भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड व परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आरोप, निवडणूक आयोगाला भाजपावाल्यांचे कृत्य दिसत नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे अधिकारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील कपूरथला येथील घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. “भाजपावाले दिवसाढवळ्या पैसे, चपला, चादरी वाटत आहेत – ते दिसत नाही. त्याऐवजी ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकायला जातात. व्वा भाजपा! दिल्लीची जनता ५ तारखेला उत्तर …

Read More »