भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात …
Read More »अतुल लोंढे म्हणाले, ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली मारकडवाडीतून सुरु झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल
लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन …
Read More »विधानसभा विशेष अधिवेशन उद्यापासून, हंगामी अध्यक्ष पदी कालीदास कोळंबकर विधानसभेचे तीन दिवस अधिवेशन मुंबईत
राज्यात नव्याने सत्तेवर स्थानापन्न झालेल्या संशयातीत बहुमाताचा आकडा गाठणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. सांसदिय प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्याद्वारे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आदी गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधानसभेचे खास अधिवेशन …
Read More »राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा आणि जातीमुक्त समाजनिर्मिती… परिवहन दिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत बोलताना व्यक्त केला निर्धार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन …
Read More »उपमुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका, विरोधकांनी रडगाण बंद… वेगवान सरकारची अडीच वर्षाची कारकिर्द यशस्वी ठरली
विरोधकांकडून गेली अडीच वर्षे आमच्यावर सातत्याने खालच्या भाषेत टीका करण्याचे काम केले. या विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करत बसू नये. आता विरोधकांनी जुनं रडगाणं बंद करुन विकासाचं नवं गाणं गावं असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. पुढे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची शासकिय फाईलीवर सही पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात रोल बदलले असले तरी… आता महाराष्ट्र थांबणार नाही-पत्रकार संघातील वार्तालापावेळी देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, गुजरातधार्जिण्या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, …
Read More »महायुतीचा शपथविधीः मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ
महाराष्ट्रात महायुतीला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागातील एका महिलेने शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya