भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? असा सवाल करत …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे मोठे वक्तव्य, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या हातात बेड्या असताना पोलिसांच्या खिशातून रिव्हॉलर कोण काढणार
बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदे याला खोट्या चकमकीत पोलिसांनी हत्या केली असल्याचा ठपका, दंडाधिकाऱ्यांच्या अहवाल ठेवण्यात आला आहे. तसेच हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयानेही स्विकारला आहे. तसेच या चकमकीत पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …
Read More »एसटी भाडेवाढीवरून दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी विधानेः मात्र भाडेवाढ तर लागू अजित पवार म्हणतात, भाडेवाढीची फक्त चर्चाः तर एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्या सेवेसाठी भाडेवाढ
राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, दावोसमधील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! असा उपरोधिक टोलाही …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती, मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या: प्रविण चक्रवर्ती
लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले …
Read More »रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा इंदौर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून खासदार सुनिल तटकरे यांनी केला शुभारंभ
जलद व अतिजलद दहा गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आज पार पडला. रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती. आजपासून रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून तर… फेब्रूवारी पासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढणार
हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, दावोस दौऱ्यातल्या कंपन्या भारतातल्या तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही ? मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला
आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या दरम्यान २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदतीची प्रक्रिया होणार पूर्णतः पेपरलेस
महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाद्वारे कार्यान्वित मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार …
Read More »शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा
दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात …
Read More »
Marathi e-Batmya