राजकारण

सचिन सावंत यांचा सवाल, सुशांतसिंह राजपूत…सीबीआय मात्र अद्याप गप्पच का? सुशांतसिंह प्रकरणी भाजपाकडून मविआ, मुंबई पोलीसांची बदनामी व सुशांतचे कुटुंब वेठीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग …

Read More »

अजित पवार २४ दिवसात ३९ विधानसभा मतदारसंघात संवाद साधणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच …

Read More »

रामदास आठवले यांचा विश्वास, भारताची अर्थव्यवस्था आगामी १५ वर्षात जगात प्रथम क्रमांकावर दुबईतील परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर आठवले यांचे वक्तव्य

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता ५ व्या क्रमांकावर असून या ५ वर्षात ४ थ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल; त्या पुढील ५ वर्षात ३ ऱ्या क्रमांकावर आणि त्या पुढील ५ वर्षांच्या काळात म्हणजे सन २०३९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत राष्ट्र जगात जागतिक महासत्ता होईल असा विश्वास केंद्रीय …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, महसूल कमाविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केला आरोप

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नरेंद्र मोदी सरकारने लाखो तरुणांचे भविष्य केवळ “महसूल वाढवण्यासाठी” त्यांच्या वर्षे वाया घालवल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून आज केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनटीएवरील प्रश्नावर ३१ जुलै रोजी राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री सुकांता मजुमदार …

Read More »

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार वीज ग्राहकांसाठी उपयुक्त अशा योजनांवर भर द्या

घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात २५,०८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला. सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. …

Read More »

हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा, लव्ह जिहाद प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा नवा कायदा आसामसाठी आणणार

मागील १० वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाने रान माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात भाजपाला राजकिय यशही मिळाले. मात्र आता आसाम मध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात जन्मठेपेची शिक्षा देणारा नवा कायदा आणणार असल्याची घोषणा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देणार श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र चा दर्जा देण्याची घोषणा

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, …महाभ्रष्टयुती सरकारची चार्जशिट प्रसिद्ध करणार राजीव गांधीच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व …

Read More »

अजित पवार यांच्या ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समन्वयकांची नेमणूक राज्यातील दौऱांची जबाबदारी या पदाधिकारी आणि मंत्र्यांवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका, एससी, एसटींना क्रिमीलेयर नको आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे नसून सामाजिक न्यायाचे

वंचित बहुजन आघाडी एससी SC अर्थात अनुसूचित जाती आणि एसटी ST अर्थात अनुसूचित जमाती च्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामधील क्रिमीलेयरच्या विरोधात असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आपल्या ट्विट म्हणाले की, न्यायमूर्ती गवई हे क्रिमी लेयरवर प्रवचन देत …

Read More »